नागभीड तालुक्यातील ढोरपा येथे जनसंपर्क दौरा व गाव भेट दरम्यान व्यक्त केले मनोगत,
राहुल रामटेके
तालुका प्रतिनिधी,नागभिड
नागभिड 27 मार्च :- चिमूर विधानसभा क्षेत्रातील जनतेनी दिलेले प्रेम व आशीर्वाद ही मी माझ्या आयुष्यात कमावलेली खरी संपत्ती आहे जो पर्यंत ही संपत्ती माझ्या सोबत आहे तो पर्यंत माझ्या विकास कामांचा व जनतेच्या सेवेचा वेग कधीच मंदावणार नाही व चिमूर विधानसभा क्षेत्रातील विकास कामांसाठी निधी कधीच कमी पडणार नाही असे प्रतिपादन चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री किर्तीकुमार बंटीभाऊ भांगडीया यांनी ढोरपा येथे जनतेशी संवाद साधतांना केले.महाराष्ट्रात सध्या महाविकस आघाडीचे सरकार आहे प्रत्येक राज्यात कोरोना कमी झाला आहे मात्र महाराष्ट्र राज्यात कोरोना वाढतच आहे राज्याची स्थिती सध्या गंभीर झाली आहे कारण हे भ्रष्ट सरकार स्वतःचे खिसे भरण्यास व्यस्त आहेत. जे सरकार संरक्षण खाते व्यवस्थित सांभाळू शकत नाही ते सरकार जनतेचे काय रक्षण करणार असा सवाल आमदार बंटीभाऊ यांनी केला त्यामुळे जनतेनी या भ्रष्ट सरकारच्या भरवशावर न राहता स्वतः स्वतःचे रक्षण करावे असे त्यांनी सांगितले.कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होत आहे व राज्य सरकार चा कोरोना विषयी नियोजन शून्य कारभार आहे त्यामुळे जनतेनी नेहमी मास्क वापरावा हात वारंवार स्वच्छ धुवावेत गरज नसल्यास बाहेर फिरणे टाळावे व आपले परिवाराचे व गावांचे रक्षण करण्यासाठी मदत करण्याची विनंती आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी केली. नागभीड तालुक्यातील शिवनाला उपसा सिंचन लवकरच पुर्ण होणार असून याचा फायदा मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांना होणार असून ५ हजार हेक्टर पर्यंत शेतीच्या क्षेत्राला याचा फायदा होणार असुन लवकरच काम पूर्ण करून देण्याचा विश्वास देखील यावेळी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी दिला.मागील रविवारी ढोरपा येथे आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या स्थानीक विकास निधी अंतर्गत हनुमान मंदिर देवस्थान येथे सभामंडप व गावातील सिमेंट रोड एकूण २० लक्ष रुपयांचे काम पूर्ण झाले असून या यांचे लोकार्पण घेतले होते परंतु महत्वाच्या बैठकीमुळे येऊ न शकल्याने आज आमदार बंटीभाऊ यांनी ढोरपा येथे भेट दिली.या वेळी भाजपा जेष्ठ नेते श्री राजुभाऊ देवतळे, ता.अध्यक्ष नागभीड संतोष भाऊ रडके,कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष आवेश भाऊ पठाण,नगर परिषद उपाध्यक्ष, गणेश भाऊ तर्वेकर,सभापती सचीन भाऊ आकुलवार, अरविंद भाऊ भुते, सरपंच सविताताई निशाणे, फुलदास उंबरकर, प्रतिभाताई मेश्राम,अनिल मदन,मुखरुजी निशाणे, बाळकृष्ण उंबरकर,ब्रह्मनंद नवघडे, व गावकरी उपस्थित होते.