आजचा सहावा दिवस
विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि.
4 एप्रील :- अनुकंपाधारक जिल्हा परिषद भंडाराच्या वतीने जिल्हा परिषदेच्या समोर 30 मार्च 2021 पासून साखळी उपोषण करण्यात आले असून मागण्या शासनामार्फत त्वरित पुर्ण व्हावे याकरिता वरिष्ठ पदाधिका-यांनी भेट दिली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या माञ प्रचलित शासन नियमानुसार अनुकंप धारकांना तत्काळ नोकरीत सामावून घेण्यात आले नाही. उलट मागच्या काळात देखील त्यांना फक्त सांत्वना देऊन उपोषण मागे घेण्यात आले होते.
दि.19 मार्च 2021 ला 38 अनुकंप धारकांचे कागदपञांची तपासणी करण्यात आले. त्यातील 15 अनुकंपाधारक हे अनुपस्थित होते. त्यांना 30 तारीख अखेरची देण्यात आली होती. त्यानंतर प्रशासनाचे चुकांमुळे सदर नियुक्तीला खूप वेळ लागतो आहे. घरचा प्रमुख व्यक्ती निघून गेल्यामुळे घरची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे नियुक्तीची अत्यंत आवश्यकता आहे. नियुक्तीला अखेरचा टप्पा बाकी असून यादी प्रकाशित करून नियुक्ती पत्र देण्यात आले नाही तर सदर उपोषण हा तीव्र गतीने होईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. या साखळी उपोषणाला अनेकांनी पाठिंबा दिला आहे. त्यावेळी लुकेश जोध, अश्विनी जांभुळकर, संदीप बावन उके, जितेंद्र कांबळे, जितेंद्र दिघोरे, विद्या विद्याधर डुंबरे, दीपक ढेंगे, संजय गभने आदी उपस्थित होते.