राहुल रामटेके
तालुका प्रतिनिधी, नागभिड
नागभिड:दि.7 एफ्रिंल गोविंदपूर -सिरपूर -नेरी या राज्य महामार्ग रोड रूंदी करण काम संथगतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी खोदकाम होवून 4-6 महीने झाले आहेत मात्र या काळात पदाधिकारी वा अधीकारी कुणाचेही लक्ष नाही. आजता -गायत जैसे थे आहे. अनेक ठिकाणी अपघात झाले. त्यामुळे परिसरातील जनतेला नाहक त्रास होतो आहे. दवाखान्यात एखाद्या रोग्याला नेतो म्हंटले तर रोडवरील झटकानी रोगाचा काही ही खरे नाही. गोविंदपूर गावालगत 4 महीने पासून मोठी नाली खोदकाम होवून आहे. कोणीतरी तिथे पडून मृत्यू होईल तेव्हा ते बांधकाम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जाईल का ? असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. दोन चाकीने प्रवास करायला सुदधा जिवावर येते. अशी रोडची अवस्था आहे. बांधकाम करण्यासाठी आवश्यक असते तेव्हाच खोदकाम करून ताबडतोब काम करावे. सिरपूर नेरी पर्यंत नुसती रोडवर गिटटी पसरली आहे. तिथून लोकांना ये – जा करायला अडचणीचे आहे. अनेक गाडीवान पडले आहेत सोबतच अनेक मोटारसायकल चे नुकसान सुदधा झाले आहे. याला जबाबदार कोण?. तसेच महत्त्वाचे म्हणजे चिमुर -सिरपूर गोविंदपूर तळोधी बस सेवा अजूनही सुरू केली नाही. हा ग्रामीण भाग म्हणून ईकडे कोणत्याही पदाधिकारी लक्ष देण्यास वेळ नाही. जनतेला हि सेवा फारच महत्त्वाचे आहे. ताबडतोब हि बस सेवा उपलब्ध करून दयावी.असी मागणी गोविंदपूर येथिल सामाजिक कार्यकर्ते आनंद शेन्डे तथा परीसरात जनतेची केली आहे.