राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
अहेरी – अहेरी तालुक्यापासून आलापल्ली हा 7 किमी अंतरावर आहे. कुठूनही अहेरी ला जाण्यासाठी हा मुख्य मार्ग समझला जातो. या रस्त्यावर नेहमीच वर्दड असते. पण रस्त्याची अवस्था मात्र फार बिघडली आहे, या कारणाने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील प्रत्येक कामासाठी किंवा भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, सिरोंचा व इतर तालुक्यातून अहेरी तालुक्यात प्रवेश करणारा मार्ग म्हणजे आलापल्ली – अहेरी मार्ग. या रस्त्यावर नेहमीच वर्दड असते. चंद्रपूर जाणारी-येणारी बस सुद्धा याच मार्गाने प्रवास करीत असतो. मुख्य म्हणजे या दोन्ही गावातील मधोमध प्राणहिता पोलीस कॅम्प असल्यामुळे दररोज अनेक कर्मचारी ड्युटी ला उशीर तर होणार नाही या भीतीने अति वेगाने दोन चाकी वाहनाने जात असतात, हे विशेष. हा मुख्य रस्ता असूनदेखील याची अवस्था मात्र पाहण्यालायक नाही. याच रस्त्यावर राजे धर्मराव हायस्कुल व कला वाणिज्य महाविद्यालय आहे. कित्येक हजारो विद्यार्थी दररोज येजा करतात. हा रस्ता पूर्णतः उकडलेला खड्डेच खड्डे यामुळे दुचाकी ने खाली पडणे हा रोजच बघायला मिळतो. एकाद दिवशी अपघात होऊन मोठा अनर्थ बघायला मिळू शकतो याच कारणाने रस्ता दुरुस्ती करून हे अनर्थ टाडावे अशी तालुक्यातील नागरिकांची मागणी आहे.