राहुल रामटेके
तालुका प्रतिनिधी, नागभिड
नागभिड(29 एफ्रिंल): शासनाने 18 ते 44 वयोगटातील सर्वाना कोरोना प्रतिंबधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय घेतला असला तरी मात्र नियोजना अभावी अनेक नागरीकांना व कर्मचाऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असल्याची घटना नागभिड मधे घडत आहे. दि.28 एफ्रिंल ला लसीकरणाचा दुसरा डोज घेण्यासाठी सकाळचे 9 वाजता पासुन लोक रागेत असतांना 10.30 वाजता नोदंणी सुरू केली . नोंदनी केलेल्या पैकी फक्त 30 जणाना वैक्सिन देण्यात आले. बाकीच्यानां मात्र आल्यापाऊली परत जावे लागले. तसेच दुसऱ्यांही दिवसी फक्त 50 जणांना वैक्सिन देवून बाकीच्या परत करण्यात आले.एकेक व्यक्ती जर दोन…दोन…दिवस येवूनही जर त्याला वैक्सिन मिळत नसेल.तर शासन लसीकरणासाठी जागृती करण्याचे कार्याचे गौडबंगाल कसाला करते असाही प्रश्न पडला आहे. एकिकडे शासन लसीकरण करण्यासाठी गाजावाजा करित असले तरी लसीचा तुडवडा हे नियोजनाच गणित बिगडवत असल्याचे समजते. लसीकरण केद्रांवर अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करूनच नत़ंर नागरीकांना लसीकरणासाठी पाचारण करण्यात यावे. जेनेकरून कोणत्याही सामान्य जनतेला उन्हातानात, रांगेत उभ राहव लागणार नाही.आणी लसीकरणाच उध्दीष्ट पुर्ण होईल यांची दक्षता तालुक्यातील सबंधीत यत्रंणेने घ्यावी असी नागभिड करांची मागणी आहे.