विजय शेवाळे
तालुका प्रतिनिधी.परंडा
परंडा:-उस्मानाबाद जिल्हयात कोरोनाचा संसर्ग दिवसे दिवस वाढत असल्याने कोरोनाचा प्रादूर्भाव रोखन्या साठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने दि ८ मे रोजी पासुन दिनांक १३ मे रोजी सकाळी ७ वाजे पर्यंत संपुर्ण उस्मानाबाद जिल्हात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे .
जनता कर्फ्यू काळात दवाखाने , मेडीकल दुकान , चष्मा दुकान , विमा कार्यालय यांना पुर्ण वेळ सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे .
तर सर्व अस्थापणे , शहर हद्दीतील पेट्रोल पंप पुर्ण पणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे .
जनता कर्फ्यूची ची महसुल , पोलिस , नगरपरिषद प्रशासनाने कडक अमल बाजावणी सुरू केली असून पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे , नायब तहसिलदार मीलींद गायकवाड, नायब तहसिलदार गणेश सुपे , नायब तहसिलदार सुजित वाबळे , व नगर परिषद यांच्या पथकाने नियम तोडणाऱ्या नागरीका वर दंडात्मक कारवाई केली .
कोरोना चा संसर्ग शहरा सह ग्रामीण भागात मोठया प्रमाणात वाढल्याने रुग्णालयात बेड अपुरे पडत असल्याने भयान परिस्थीती निर्माण झाली आहे .
परंडा तालूक्यात कोरोनाचे ४९४ रुग्ण आसुन परंडा उप जिल्हा रुग्णालयात ६० रूग्णावर तर डॉ बाबासाहेब आंबेडकर वस्ती गृह येथील कोवीड सेंटर मध्ये ६९ रुग्णावर तर संत मीरा स्कुल येथील कोवीड सेंटर मध्ये ५५ अश्या एकुन १८९ रुग्णावर उपचार सुरू असुन ३०५ रुग्णावर गृह विलगीकरण करून उपचार देण्यात येत आहेत .
मुत्यूचा आकडा वाढत असुन आज पर्यंत ९८ रूग्णांचा कारोना मुळे तर सारी मुळे १३ असे एकुन १११ रूग्णांचा उपचारा दरम्यान मुत्यू झाला आहे .
तर दि ७ मे रोजी सायंकाळी ३ रुग्णाचा मुत्यु झाला या मध्ये देवगाव खुर्द , मलकापुर , सोनारी येथील रूग्णाचा समावेश आहे तर दि ८ रोजी सकाळी कंडारी येथील एका रुग्णाचा मुत्यू झाला आहे .
परंडा तालूक्यातील १६ गावे हॉट स्पॉट झाले आहे .