नवेगावबांध ता.२१.
महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार या कोरोनाचा काळामध्ये प्रत्येक दिवशी शंभर गरजू व गरीब व्यक्ती करिता मोफत शिव थाळी केंद्राचे लोकार्पण आज दि.२१मे रोज शुक्रवारला माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांच्या हस्ते पार पडले. सदर कार्यक्रमाला अन्न प्रशासन विभागाचे मुकुंद माहुरे, नवेगावबांध ग्रामपंचायतचे सरपंच अनिरुद्ध शहारे, समाधान रेस्टोरेंट चे संचालक परेश उजवणे, प्रसिद्ध उद्योजक नवल चांडक नवेगावबांधचे तलाठी पुंडलिक कुंभरे यांच्या उपस्थितीमध्ये शिव भोजन थाळी केंद्राचा शुभारंभ नवेगाव बांध येथील समाधान रेस्टारंटमध्ये पार पडले. सदर योजनेचा लाभ हा नवेगाव बांध व परिसरातील गरजू आणि गरीब लोकांना मिळेल अशी आशा व्यक्त केली.खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नांमुळे मंजूर झाल्यामुळे जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनी त्यांचे आभार मानलेआहे. परिसरातील गरीब व गरजू व्यक्तींनी या शिवभोजन थाळीचा लाभ घ्यावे. असे आवाहन या प्रसंगी जनतेला केले आहे.