शेतक-यांचे नुकसान
विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि.10 जुन :-
सध्या स्थितीत उन्हाळी धान हे केंद्रावर मोजण्यासाठी ठेवलेले आहे. परंतु शासन अजूनही मोजमाप करत नाही. हंगाम येऊन ठेपलंय केंद्रावर ताडपत्र्यांची सोय नाही. त्यामुळे धान खराब होण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. मागील बोनस अजूनही मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना बिजाई घेण्यासाठी कमालीचा त्रास होत आहे. त्यातही दुकानदारांनी लूट मांडली आहे. त्यांच्यावर कोणतेही नियंत्रण नाही. खतांची किंमत वाढली आहे. त्यासाठी शासनाने धानाच्या लागवडी नुसार शेतकऱ्यांना योग्य किंमतीत खते उपलब्ध करून द्यावे, तसेच बीज हे शेतकऱ्यांना सोयीच्या किंमतीत आठ दिवसात उपलब्ध करून द्यावे. व थकीत बोनसही त्वरित शेतकऱ्यांना द्यावे. केंद्र शासनाने ६ हजारची रक्कम याच वेळी शेतकऱ्यांना द्यावे अशी मागणी भाजपा (ग्रामीण) तालुका अध्यक्ष विनोद बांते
यांनी केली आहे.