विजय शेवाळे
तालुका प्रतिनिधी परंडा
परंडा:-दिनांक16जुन:-दिवसेंदिवस खतांच्या किमती वाढत असल्या, तरी शेतकऱ्यांवर त्याचे बर्डन येऊ नये यासाठी यासाठी डीएपीसह इतर काही खतांवरील अनुदानात केंद्रीय मंत्रिमंडळाने १४ हजार ७७५ कोटी रुपयांनी वाढ केली आहे.
युरियानंतर, डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) हे देशात अधिक प्रमाणावर वापरले जाणारे खत आहे.
डीएपी खतावरील अनुदान १४० टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय केंद्राने गेल्या महिन्यात घेतला आहे.
DAP च्या आंतरराष्ट्रीय बाजारभावांमध्ये वाढ झाली असली शेतकऱ्यांना डीएपीची एक बॅग १२०० रुपयांच्या जुन्या दराने देण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेतला होता.
शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी डीएपी खतावरील अनुदानात वाढ करण्यास आर्थिक व्यवहारांबाबतच्या मंत्रिमंडळ समितीने मान्यता दिल्याचे रसायने व खते राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितले आहे.