विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि.१ जुलै:-
ग्राम पंचायत गणेशपुर यांच्या भोंगळ कारभारामुळे
जि. प. क्षेत्र गणेशपुर अंतर्गत येणाऱ्या गायत्री कॉलोनी येथे मागील 3 वर्षापासून कोणतेही काम झाले नाहीं. मोठ्या प्रमाणात कॉलोनीतुन टँक्सच्या माध्यमातून वसूली केली जाते. मात्र गायत्री नगर येथे नाल्यावर छाकने व ग्राम पंचायतच्या वतीने सार्वजनिक नळ नाही. सार्वजानिक बोरवेल नाही. नाल्याचे काम कित्तेक दिवसांपासून रखडलेले आहे. अशा प्रकारे कोणतेही विकास कामे करण्यात आले नाही. म्हणुन गायत्री नगरच्या नागरिकांनी पवन भाऊ मस्के यांचे कडे तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने निवेदन ग्राम पंचायतला देऊन बजावण्यात आले आहे. ग्राम पंचायतच्या मार्फतीने गायत्री नगर येथे त्वरित नाल्यावर छाकने व सार्वजनिक नळ, बोरवेल, नाल्याचे रखडलेले त्वरित काम झाले नाही तर आंदोलनाची भूमिका घेऊन सरपंचाचा पुतळा ग्राम पंचायत समोर जाळण्यात येईल असे बजावण्यात आले. यावेळी गायत्री नगरातील नागरिका सोबत पवन मस्के, भाजपा सदस्य अशोक भूरे, अजय (बाल्या) साकुरे, दिनेश बडवाईक, अशोक खोब्रागडे, पंचफूला गभणे, वनिता मानकर, पांडुरंग देशमुख, विजय वंजारी, देवराव फुंडे, दुर्गा थोटे, राजेश वहीवे, चिनाजी वैद्य, राजू भूरे इत्यादी त्रस्त नागरिक उपस्थित होते.