गाद व किड रोगामुळे नुकसान झालेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत द्या.
पुस्य नक्षत्रापासून पावसाची रिमझिम.
आणेवारी शेतकऱ्यांच्या उपस्थित करावी जाहीर.
संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया.
नवेगावबांध ता.१४ सप्टेंबर:-
गोंदिया जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात भात पिकांवर मोठ्या प्रमाणावर गाद व इतर कीड रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. तर पुष्य नक्षत्रापासून ढगाळ वातावरण व पावसाची अधूनमधून रिमझिम सुरु आहे.मात्र दमदार पाऊस येत नसल्याने परिसरातील नवेगावबांध जलाशय व इटीयाडोह धरण अजून पूर्ण भरले नाही.परिसरातील तलाव,बोळ्याही रिकाम्याच आहेत.मात्र या ढगाळ वातावरणामुळे पोषक वातावरणा अभावी गाद व इतर कीड रोगाचे आक्रमण भातपिकावर झाले आहे.त्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीचे सर्वेक्षण करून मदत देण्यात यावी. अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनी जिल्हाधिकारी गोंदिया व खासदार प्रफुल्ल पटेल यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे .धान उत्पादनात होणारी घट पाहता शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. संपुर्ण शेत शिवारात या खरिप हंगामात लावलेल्या जवळपास प्रत्येक धान पिकावर ९०% गादमाशी चा प्रकोप आढळून येत आहे. याचा परीणाम सरळ उत्पादनावर होऊन, या खरिप हंगामात धानाचे उत्पादनात नव्वद टक्के नुकसान होणार आहे. या कीडरोगा मुळे धान उत्पादक शेतकरीवर्ग हवालदिल असून,शेतकऱ्यांची पार झोप उडाली आहे. शासनाकडून वेळीच दखल घेत पंचनामे करून ,व पीक विमा ज्या शेतकर्यानी काढलेला आहे. त्याना याचा आधार मिळणे गरजेच आहे. 1001 या जातीच्या धानपिकाला मधे 90% गादमाशी ने ग्रासले असून,पीक पोखरलेला आहे. कृषी विभागाने दखल घेऊन तात्काळ परिस्थितीत ची पाहणी करुन पुढील निर्णय घ्यावे. ही रास्त अपेक्षा आहे.दुरून दुरून धान पीक हिरवीगार दिसत असली तरी प्रत्यक्षात मात्र जवळून निरिक्षण केले असता पीक रोगाने ग्रासले दिसून येत आहे. महसुल विभाग व कृषी विभाग महसुल गाव साझ्या नुसार पीक कापनीचे प्रयोग करून योग्य आणेवारी शेतकऱ्यांच्या उपस्थित त्याचा अहवाल सादर करावा.अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
तसेच ज्यांच्या शेतात पीक कापनीचे लाॅट टाकले आहेत. त्याची यादी संबंधित विभागाने जाहीर करावी. जेणेकरून त्या विभागाच्यागोपनीय अहवालात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही.अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
दरम्यान भात पिकाची खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा भात पिकाच्या उत्पादनात 10 ते 20 टक्के उत्पादन होण्याची शक्यता शेतकरी वर्गात वर्तवली जात आहे. गाद व इतर कीड रोगां मुळे धान उत्पादकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनी जिल्हाधिकारी गोंदिया व खासदार प्रफुल्ल पटेल यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.