विजय शेवाळे
तालुका प्रतिनिधी परंडा
कष्ट हेच जीवन या वाक्याप्रमाणे
कष्टकरी मजूरी करणारे पोटाची खळगी भरण्यासाठी प्रचंड मेहनत करणारे अवलिया म्हणजे ईश्वर संगोलकर , वारणा सहकारी कारखान्याचे ऊस टोळी तील कामगार ईश्वर भाऊ नी सकाळी 6 ते संध्याकाळी सहा पर्यन्त तबबल 16 टन ऊस तोडला ,नक्कीच यांचे नावे हा विक्रम नोंदवायला हवा आज सोशल मीडिया ,न्यूज मधून यांची वाहवाह होत आहे ,परंतु नुसते वाह वाह करून उपयोग नाही तर ईश्वर भाऊ चा कारखान्याने ,मोठा सन्मान करायला हवा त्याचे मेहनतिची कदर करायला हवी नक्कीच ऊस तोड कामगारांचं मनोधौर्य वाढेल ,आज राज्यात थंडी ची लाट सुरू आहे ,परंतु ऊस तोड कामगारांना शेतातील ऊस तोडायचा वेळ ठरवून दिलेला असतो त्यामुळे थंडी असो किंवा अस्मानी संकट असो पहाटे 4 वाजता उठून ऊसाचे फडात जावंच लागते ,व त्या वेळेत ऊस तोडून मोळी बांधून त्या वाहनात भरून द्यावे लागतात , सामान्य मजुरांना कुटुंब जगवणे हे आव्हान असते,त्यामुळे ते कोणतेही अंग मेहनतीचं काम हे अगदी सहज करतात ,चार पैसे जास्त मिळतील या आशेने प्रचंड मेहनत करतात ,हल्ली तर
बेरोजगारी एवढी वाढलीय त्यामुळे ऊस तोड कामगारात सर्व सामान्य कुटुंबातील सुशिक्षित तरुण ही दिसून येतात ,बरेच वर्षे झाले मोठी नोकरभरती नाही, चुकून भरती असेलच तर 5,6 जागा निघतात व अर्ज येतात 2 ते,3 लाख यामुळे नौकऱ्या मिळणं पण सध्या कठीण झालेय ,निसर्गाचा लहरीपणा अवकाळी चा तडाखा ,कधी दुष्काळ यामुळे अल्प भु धारक शेतकरी पण पूर्ण नेस्त नाबूत होत चाललंय ,यामुळं या शेतकऱ्यांची पोर बाळ सुद्धा ,कारखान्याची उचल घेऊन ऊस तोड कामगार म्हणून जातात ,ऊस तोड कामगार थंडी ,उंण, वारा,अशी अनेक संकट झेलीत पहाटेच्या चंद्र ,चांदण्या च्या प्रकाशात ऊस तोडणी करत असतो कित्येक मजुरांना कोयत्यामूळ जखमा होतात। कधी सर्प दंश होतात ,यामुळ ऊस तोडणी। कामगारांना ,व कुटुंबला विम्याचे कवच असायला हवं ,कांमगारांचं मुकादम,ठेकेदार यांनी कामगारांचा विमा करून घ्यायला हवा ,जेणेकरून ऊसाचे फडात काही अपघात झाला तर त्यांचे कुटुंबाला विम्याची रक्कम मिळेल ,असे मत मांगी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण अवचर यांनी व्यक्त केले