जिल्हाधिकारी यांना निवेदन
विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी
भंडारा.
भंडारा,दिनांक ३१ जानेवारी:- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने किसान विरोधी कायदे रद्द करून शेतकरी आंदोलन मागे घेण्यासाठी दिलेले आश्वासन पत्राची अंमलबजावणी केली नाही. म्हणुन विश्वासघात केल्याच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने ३१ जानेवारीला देशव्यापी “विश्वासघात दिवस” पाडण्याचे आवाहन केले होते.
महाराष्ट्र राज्य किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्ष भंडारा जिल्ह्याच्या वतीने भाकपचे जिल्हा सचिव व दलित अधिकार आंदोलनाचे जिल्हा समन्वयक कॉम्रेड हिवराज उके व किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सदानंद इलमेे यांच्या नेतृत्वात भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्वासघात दिनानिमित्त निदर्शने आंदोलन करून महामहीम राष्ट्रपती यांचे नावे जिल्हाधिकारी मा. संदीप कदम यांना देशव्यापी व स्थानिक २१ विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
त्यात शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी नुसार लाभदायक हमी भाव मिळण्यासाठी एम एस पी चा कायदा करा. संयुक्त किसान मोर्चा च्या नेतृत्वात आंदोलनकारी शेतकऱ्यांवरील गुन्हे रद्द करा. आंदोलनातील व लखीमपुर-खीरी हत्याकांडातील शेतकऱ्यांना व शहीद पत्रकार इत्यादीना नुकसानभरपाई द्या. लखीमपुर खीरी शेतकरी हत्याकांडातील सूत्रधार केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांचा राजीनामा घेऊन त्यांना त्वरित अटक करा. वीजबील महाग व खाजगीकरण करणारा शेतकरी व जनविरोधी विज बिल २०२० केंद्र सरकारने परत घ्यावे. कामगार कर्मचाऱ्यांच्या हिताचे कामगार कायदे पूर्ववत करून कामगार विरोधी चार संहिता (कोड) रद्द करावे. सर्व सरकारी व सार्वजनिक उपक्रमांचे केंद्र सरकारने केलेले खाजगीकरण रद्द करण्यात यावे. महिला व सर्वसामान्य जनता विरोधी, बहुजन विरोधी,व शिक्षणापासून वंचित करणारे नवीन शैक्षणिक धोरण २०२० रद्द करण्यात यावे. एस.टी. कामगार- कर्मचाऱ्यांची राज्य शासनात ” विलिनीकरणाची मागणी” त्वरित पूर्ण करण्यात यावी व एसटी बस सेवा पूर्ववत करून प्रवाशांची कुचंबना थांबविण्यात यावी. राज्यातील व केंद्र सरकार मधील सर्व रिक्त जागा त्वरित भरून बेरोजगारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकऱ्या देण्यात यावे किंवा नोकर्या मिळेपर्यंत बेरोजगारी भत्ता देण्यात यावे. डिझेल, पेट्रोल, गॅस सिलेंडर, तेल इत्यादी सर्व वस्तूंची महागाई कमी करण्यात यावी. मनरेगाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करून शहरी कामगारांना सुद्धा किमान 200 दिवस रोजगार देऊन योग्य मजुरी देण्यात यावी. फुटपाथ दुकानदारांना त्याच ठिकाणी परवडणाऱ्या दरात व कीस्तिने नगर परिषदेने बनविलेले गाडे देण्यात यावे. भंडारा शहरातील नागरिकांना दूषित पाण्यापासून मुक्ती देऊन सध्या सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची समय सीमा निर्धारित करून अविलंब पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच पाईप लाईन घालण्यासाठी फोडलेला रोड त्वरित दुरुस्त करण्यात यावा. शिंगोरी ते मुजबी पर्यंत हायवेचे त्वरित चौपदरीकरण करून भंडारा शहरात उड्डाणपूल बांधण्यात यावे. तसेच भंडारा तुमसर रोड त्वरित बनवण्यात यावे. भंडारा स्मशानभूमीचा मार्ग त्वरित पूर्ववत करून नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून व अपघातापासून संरक्षण द्यावे. शहरी व ग्रामीण अतिक्रमण घरकुल धारकांना घरांचे मालकी पट्टे द्या. तसेच बेघरांना घरे बांधून देण्यात यावे. जबरान जोतदार शेतकऱ्यांना वन हक्क कायद्याप्रमाणे मालकी पट्टे देण्यात यावे. कलेक्टर चौक भंडारा समोरील आंदोलनाच्या जागेचे अद्यावत सौंदर्यीकरण करण्यात यावे. तसेच शहरात आवश्यक ठिकाणी महिला व पुरुषांसाठी अद्यावत प्रसाधनगृहे बांधण्यात यावे आणि मुख्य तलाव व बगीच्यांचे सौंदर्यीकरण करून पर्यटन क्षेत्राचा दर्जा द्यावा. प्रस्तावित सांस्कृतिक भवन त्वरित तयार करण्यात यावे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाचा दर्जा वाढवून मेडिकल कॉलेज करण्यात यावे इत्यादी मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे.
वरील सर्व मागण्यांवर शिष्टमंडळाच्या उपस्थित कॉम्रेड हिवराज उके व जिल्हाधिकारी संदीप कदम यांची मुद्देसूद सुमारे अर्धा तास सविस्तर चर्चा करण्यात आली. केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करून त्यांच्या अधिकार क्षेत्रातील मागण्यांची दखल घेण्याचे व तसे सूचित करण्याचे माननीय जिल्हाधिकारी यांनी मान्य केले.
आंदोलनात काॅ. हिवराज उके काॅ. सदानंद इलमे, गजानन पाचे, माणिकराव कुकडकर, प्रियकला मेश्राम, वामनराव चांदेवार, दीपक गजभिये, विलास केजरकर ,वाल्मीक नागपुरे, रत्नाकर मारवाडे ,गणेश चिचामे, ताराचंद आंबाघरे, अरुण पडोळे, महादेव पेसने, गोपाल वैद्य, विधाता शिंगाडे, अलका सतदेवे, महानंदा गजभिये, मंगला सतदेवे, शिवाजी मस्के, नंदकिशोर रामटेके, झिटूजी ताईतकर तसेच संयुक्त लोकशाही आघाडीचे डॉ. देवानंद नंदागवळी व अचल मेश्राम उपस्थित होत.