सूर्यकांत वाघमारे
जिल्हा प्रतिनिधी
लातूर
लातूर जानवळ भागातील सततच्या पावसामुळे सोयाबीन हे पीक जागच्याजागी वापुन निघालेले आहे. आता सांगायचं तरी कसं दुष्काळात तेरावा महिना, म्हणजे अगोदर जून महिन्यामध्ये पेरणी उशिरा झाली. त्यानंतर जे पेरलेले बी होते ते वापलेच नाही. मग शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. मग कसं तरी सोयाबीन वापल पण नंतरच्या काळात सोयाबीनला शेंगा फार कमी प्रमाणात लागल्या त्यानंतर ज्या शेंगा लागलेल्या आहेत त्या शेंगावर रोग पडला.आणि अळ्या पडू लागल्या पुन्हा नंतर सतत आठ ते दहा दिवस पावसाच्या माऱ्यामुळे सोयाबीन जागच्याजागी वापुन निघाले.आज शेतकऱ्यांची अशी अवस्था झाली आहे.दुसऱ्यांचे कर्ज काढायचं पेरणी करायची बाकी सर्व निसर्गाच्या हातामध्ये आणि निसर्ग काही साथ द्यायला तयार नाही. शेतकऱ्यांच्या हातामध्ये हे ते शेवटपर्यंत ठीक पडेल तोपर्यंत विश्वास नसतो. आणि त्याच गोष्टी आत्ता घडलेल्या आहेत जानवळ येथील कष्ट करू शेतकरी सुभाष धारू राठोड यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर चार एकर सोयाबीन लावले होते. आणि त्याचं पालन पोषण ही व्यवस्थित केलं होतं पण निसर्गाच्या पुढे कोणीच जात नाही. आणि धारू राठोड यांचं संपूर्ण सोयाबीन वापुन निघाल्या बद्दल त्यांचं असं म्हणणं आहे की तात्काळ कृषी अधिकाऱ्यांनी शेतावर येऊन पंचनामे करावेत व आम्हाला न्याय मिळवून द्यावा. शेतकऱ्यांकडून कडून सरकारला अशी विनंती आहे की आम्हास नुकसानभरपाई मिळावी जर पंचनामे झाले नसतील तर शेतकरी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करतील असा इशारा जानवळ येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.