विलास केजरकर,
जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे दिनदर्शिका २०२२ नुसार व माननीय श्रीमती अंजू शेंडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा यांच्या मार्गदर्शनाखाली बहुउद्देशीय सभागृह, आयुध निर्माणी भंडारा येथे ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिन’ माननीय श्रीमती अंजू एस. शेंडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा यांच्या अध्यक्षतेखाली मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरूवात दिप प्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे रोपटे व पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय अंजू शेंडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा यांनी कायद्याचा मुळ उद्देश हा असुरक्षीत लोकांना संरक्षण देणे आहे. कामगारांनी कुठेही काम करत स्वत:चे अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे असे सांगितले. काेणतेही कारखाने फक्त अधिका-यांच्या आधारावर चालत नाहीत तर त्यासाठी कामगारांची अतुट मेहनत असते. त्या संस्थेतील अधिकारी व कामगार यांच्या कामाचा हेतू एकच असतो म्हणून कामगारांशी सामंजस्याने वागायला पाहिजे. तसेच त्यांनी कामगार हा समाजातील एक मुलभूत घटक आहे. म्हणून त्यांचे मुलभूत हक्कांचे उल्लंघन होउ न देता त्यांचे मानसिक आरोग्य, शारिरिक आरोग्य चांगले राहावे यासाठी प्रयत्न करण्याचे उपस्थित सर्वांना आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. श्री. सुहास प्र. भोसले, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा यांनी केले. प्रास्ताविकातुन त्यांनी आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्याचा उद्देश यावर बोलताना जगभरात १ मे दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिवस साजरा केला जातो. कोणत्याही समाजाच्या आणि देशाच्या विकासात कामगारांची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे. कामगारांच्या या योगदानाची दखल घेऊन त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून जगभर १ मे या दिवशी कामगार दिवस साजरा केला जातो. कामगारा संबंधीच्या कायद्यांचा जागर या कार्यक्रमात होणार असल्याचे प्रास्ताविकपर भाषणात सांगितले.
माननीय श्री. पी. एस. खुणे, जिल्हा न्यायाधीश -१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, भंडारा यांनी कामगारांविषयी कायद्यांचा उद्देश कामगारांना संरक्षण देवून त्यांचा विकास करणे हाच आहे. कंत्राटी कामगार अधिनियम १९७० नुसार कंत्राटी कर्मचा-यांच्या अधिकारांचे संरक्षण कसे करता येईल तसेच त्यांना विमा सुरक्षा मिळावी, भविष्य निर्वाह निधी मिळावा याबाबत कायद्यात मार्गदर्शक सुचनांची त्यात तरतूद करण्यात आली आहे. तसेच त्यांनी कामगारांच्या अधिकारांविषयी असणा-या इतर कायद्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
श्री. पी. के. मेश्राम, महाप्रबंधक, आयुध निर्माणी, भंडारा यांनी आयुध निर्माणी, भंडारा येथील कामगारांच्या हक्काचे संरक्षणाकरिता ते नेहमी प्रयत्नशील आहेत. आयुध निर्माणी, भंडारा येथील कोणत्याही कामगारांचे प्रकरणे न्यायालयात प्रलंबित नाही. आयुध निर्माणी, भंडारा येथे कामगारांचे वाद तसेच काही मागणी असल्यास संघटनाच्या मध्यस्थीने अशा प्रकरणांत समझाेता करण्यात येताे व कामगारांच्या समस्यांचे निराकरण करण्यास ते नेहमी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी मा. श्री. सी. एल. देशपांडे, जिल्हा न्यायाधीश-२ तथा अतिरीक्त सत्र न्यायाधीश, भंडारा, मा. श्री. एम. ए. कोठारी, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, भंडारा, मा. श्री. ए. के. आवारी, मुख्य न्यायदंडाधिकारी, भंडारा, मा. श्री. पी. पी. देशमुख, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, भंडारा, मा. श्री. आर. पी. थोरे, सह दिवाणी कनिष्ठ स्तरावरील तथा न्यायदंडाधिकारी प्रथमश्रेणी, भंडारा, मा. श्रीमती पी. ए. पटेल, २रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथमश्रेणी, भंडारा, मा. श्रीमती सी. वाय. नेवारे, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथमश्रेणी, भंडारा, मा. श्री. आर. पी. पंत, अपर महाप्रबंधक, आयुध निर्माणी, भंडारा, मा. श्री. ललित कुमार, अपर महाप्रबंधक, आयुध निर्माणी, भंडारा तसेच आयुध निर्माणी, भंडारा येथील अधिकारी, कर्मचारी व मोठया संख्येने कामगार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन श्री. अमोल भुजाडे, अधिवक्ता भंडारा, स्वागतपर मार्गदर्शन श्री.विवेक पाठक, कनिष्ठ कार्य प्रबंधक, आयुध निर्माणी, भंडारा यांनी केले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी व यशस्वीतेसाठी आयुध निर्माणी, भंडाराचे कनिष्ठ कार्य प्रबंधक श्री. विवेक पाठक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडाराचे अधिक्षक श्री. डब्ल्यू. एल. कापगते तसेच कनिष्ठ लिपिक मोहन हुंडरी, प्रशांत कुंभारे व शिपाई श्री. गाेन्नाडे, श्री. कातोरे, श्रीमती वासनीक यांनी मोलाचे सहकार्य केले.