सिल्ली येथे संस्कार चे नि:शुल्क शिबिराचे उद्घाटन
विलास केजरकर,
जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा:- पुर्वीचे विद्यार्थी मामाच्या गावाला जाऊन मौजमजा करत असत. मात्र उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थी हे टवाळख्या करत असतात. आज स्पर्धेच्या युगात वावरत असतांना विद्यार्थ्यांच्या बालमनावर योग्य सुसंस्कृत संस्कार व्हावेत या उदात्त हेतूने संस्कार चळवळ भंडारा च्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून शहरातील विद्यार्थ्यां बरोबर ग्रामीण विद्यार्थ्याकरिता नि:शुल्क ग्रीष्मकालीन संस्कार शिबिर घेतले जात आहे.
ग्रीष्मकालीन संस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बालमनावर योग्य सुसंस्कृत संस्कार व्हावे असे प्रतिपादन भंडारा पंचायत समितीचे नवनिर्वाचित उपसभापती प्रशांत खोब्रागडे
ते संस्कार चळवळ, विनोद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सिल्ली व रामपा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सिल्ली येथील संस्कार शिबिराच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
ग्रीष्मकालीन संस्कार शिबिराचे उद्घाटन भंडारा पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत खोब्रागडे यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनोद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एस. भंडारकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून शालवन कोचिंग क्लासेसचे संस्थापक संदीप मेश्राम, पर्यावरण तज्ञ पद्माकर डुंभरे, शिबिर सहप्रमुख तथा पतंजली योग समितीचे जिल्हा महामंत्री यशवंत बिरे, संस्कार शिबिराचे संयोजक तथा शिबीर प्रमुख विलास केजरकर, भारतीय स्टेट बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी तथा शिबिर सहप्रमुख रमेशचन्द्र गजभिये उपस्थित होते.
याप्रसंगी भंडारा पंचायत समितीचे नवनिर्वाचित तरूण उत्साही उपसभापती प्रशांत खोब्रागडे यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
बालवयापासून वृद्धापर्यंत विविध संस्कार केले जातात. त्याचाच महत्त्वाचा भाग म्हणून संस्कार चळवळीने गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्याकरिता चालवलेले शिबीर म्हणजेच संस्कार शिबिर होय. याशिबिराच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांच्या बाल वयापासूनच योग्य संस्कार झाले तर तो विद्यार्थी संस्कृत आदर्श व्यक्ती म्हणून गणल्या जात असतो. त्याच उदाहरण म्हणजेच संस्कार शिबिर हे आदर्श विद्यार्थी घडविण्याचा कारखाना आहे. असे मतविनोद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एस. भंडारकर यांनी व्यक्त केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन विद्यार्थ्यांवर कश्याप्रकारे संस्कार व्हावेत याकरिता सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिबिर सहप्रमुख रमेशचंद्र गजभिये व प्रास्ताविक पतंजली योग समितीचे जिल्हा महामंत्री यशवंत बिरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिबीर प्रमुख तथा संयोजक विलास केजरकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता आचल देशमुख, समीक्षा चकोले, प्रिया वंजारी, वैष्णवी चाचेरे, ऐश्वर्या ढोके, राजश्री साखरवाडे, श्रेया ब्राम्हणकर, माही खोब्रागडे, शिवम साखरवाडे, साहिल साखरवाडे, वेदांती गभणे, पंकज साखरवाडे, जानवी सेलोकर, वेदांत गभणे, शुभांगी साखरवाडे, निल खोब्रागडे, अंकिता साखरवाडे, सांची सुखदेवे, विलास वरणकर, सायली जगनिक, कशिश अहिर, संजना भुरे, सुजल मस्के, समीर जांगळे, मयुर मस्के तसेच विनोद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक वृंद कर्मचाऱ्यांनी व संस्कार शिबिरार्थ्यांनी सहकार्य केले.