विलास केजरकर,
जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा :- जिल्ह्यात केंद्र शासनाचा उपक्रम नवोदय विद्यालयात नियमां नुसार नावव्या वर्गासाठी ८० जागा रिक्त असतांना प्रवेश परीक्षा फक्त ४० जागांसाठी घेण्यात आली. हा भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. भारतातील अन्य जिल्ह्याप्रमाणे भंडारा येथील नवोदय विद्यालयात सुद्धा विद्यार्थी प्रवेश क्षमता ८० करा. या मागणीसाठी पालकांच्या शिष्टमंडळाने भंडारा जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.
नवोदय विद्यालय समिती, नोएडा, दिल्ली मार्फत संपुर्ण भारतात इयत्ता सहावी, नववी व अकरावीसाठी केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. भंडारा जिल्ह्यातिल नवोदय विद्यालय, मोहाडी तालुक्यातील पाचगाव येथे आहे. येथे ८० जागां रिक्त असतांना जाहिरात ४० विद्यार्थी क्षमतेची देण्यात आली आहे. म्हणजे ४० विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. त्यामुळे होतकरु विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहु नये यासाठी नवोदय विद्यालय पालक संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन दिले व मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत नवोदय विद्यालय प्रशासन सदैव दुजाभाव करित असतो. असा आरोप सुद्धा करण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी ९ व्या वर्गात प्रवेशासाठी परीक्षा दिली आहे. आगामी पंधरा दिवसात निकाल येणार आहे. त्यावेळी एकूण ८० विद्यार्थ्यांच्या निकालाची घोषणा करण्यात यावी ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे. या पुर्वी सुद्धा नवोदय विद्यालय संदर्भात अनेक आंदोलने झालीत हे विशेष.
पालकांच्या शिष्टमंडळात नागपूर विद्यापीठ सिनेट सदस्य प्रवीण उदापूरे, गोसीखुर्द प्रकालपग्रस्त संघर्ष समितीचे प्रमुख धनंजय मुलकलवार, नवोदय विद्यालय पालक संघर्ष समितीचे अध्यक्ष भाऊ कातोरे, शिक्षा बचाओ आंदोलन समितीचे जिल्ह्या अध्यक्ष नितिन निनावे, यशवंत भोयर, द्वारका बोरकर, स्नेहा भोवते, योगिराज हटवार, अनिल गडेकर, तरुण भोवते, योगेश्वर नागपुरे, संतोष अतकरी, सुनील बुरडे, दिनेश निबांर्ते, अजय चव्हाण इत्यादी पालक उपस्थित होते.