राहुल रामटेके
तालुका प्रतिनिधी,नागभिड
नागभिड: रक्तसाठा कमी असल्याने रुग्णाची गेरसोय होत आहे. उन्हाळा सुरू असल्याने रक्तदात्यांची संख्या कमी भासत आहे.म्हणून सामाजिक बांधिलकी म्हणून आपण राजकीय पक्ष.समजिक संस्था व युवक वर्ग.या अश्या संघटनानी रक्तदान शिबिराचे आयोजन करून रुग्णाचे प्राण वाचवावे.त्यामुळे नियमित गंभीर रुग्णांना रक्त पुरवठा करणे शक्य होईल.कारण रक्ताची मागणी खूप वाढली असल्यामुळे ब्लड बँकमधे रक्त साठा कमी दिसून येत आहे. रक्दात्यांची संख्या उन्हाळा असल्यामुळे खूप कमी दिसत आहे म्हणून ब्लड बँक मधे दिवसेंदिवस रक्ताचा तुटवडा भासत आहे.वेळीच रक्त न मिळाल्यामुळे अनेक रुग्णांना आपल प्राण देखील गमवावा लागतो.म्हणून मी (रक्तमित्र ) विकास बोरकर (स्वप्नपूर्ती रक्त सेवा) तर्फे युवकांना एवढेच सांगू इच्छितो की तुम्ही समोर येऊन रक्तदान शिबिरे आयोजित करा असे आव्हाहन मी स्वप्नपूर्ती रक्त सेवा द्वारे करीत आहे