विलास केजरकर
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा : जिल्ह्यातील धान खरेदी सुरू करून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धानाचे पोते घेवून प्रहार कार्यकर्ते व शेकडो शेतकरी धडकले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्याशी सकारात्मक चर्चा करून आठ दिवस मुदत दिली. जर आठ दिवसात आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी प्रहार जिल्हा प्रमुख अंकुश वंजारी, साकोली विधानसभा प्रमुख प्रहार चंद्रशेखर टेंभुर्णे, प्रहारचे जिल्हा रुग्णसेवक मंगेश वंजारी, विजय हटवार, ज्ञानेश्वर बेंद्रे, सदाशिव खेत्रे, ज्ञानेश्वर बोर्डे, रामभक्त निसार, पप्पू मातेरे, श्रीकांत बघणारे, संजय मातेरे, अचल मेश्राम, श्रीकांत बावनकुळे, विवेक नागतोडे, विनोद वंजारी, गुणवंत भुरे, चेतन गभणे, चेतन श्राद्धे इत्यादी उपस्थित होते.