राम भोस्तेकर
विभागीय उपसंपादक कोकण
माणगांव तालुक्यातील निजामपुर ग्रामरंचायत हद्दीतील काेस्ते बुद्रुक गावाजवळ असणाऱ्या जे,टी एल या कंपनी कडुन मागील दाेन महीन्यापासुन जी आय प्लांट चालुकरुन जी आय पाईप साठी काेटींगकरीता वापरण्यात येणारे रसायनयुक्त विषारी सांडपाणी काळ नदी पात्रात साेडण्यात येत हाेते याची तक्रार ग्रामस्थांनी सरपंच राजाभाऊ रणपिसे यांच्याकडे केल्यानंतर तात्काळ दखल घेत सदर कंपनीला ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातुन जी आय प्लांट बंद करण्याची नाेटीस देखील बजावली मात्र काही कंपनीच्या मुजाेर अधिकाऱ्यांनी नाेटीस ला केराची टाेपली दाखविली हाेती, या कंपनी विराेधात सरपंच राजाभाऊ रणपिसे यांनी उठविलेला आवाज व त्याची खासदार सुनिलजी तटकरे व पालकमंत्री आदीती तटकरे यांनी वरच्या स्तरावर घेतलेली दखल यामुळे प्रदुषण नियंत्रण मंडळाने अध्यादेश जारी करुन पुढील सुनावणी हाेईपर्यंत कंपनीचा जी आय प्लांट बंद ठेवण्याचे आदेश दिल्यामुळे कंपनीचा प्लांट बंद ठेवण्यात आला आहे.
सुमारे आठ गावांची पाणीपुरवठा याेजना अवलंबुन असलेल्या जँकवेल जवळच हे दुषित पाणी साेडण्यात येत हाेते या प्रकाराची प्रथम नागरिक म्हणुन दखल घेतल्याबद्दल सरपंचांचे निजामपुर नागरिकांकडुन काैतुक हाेत आहे.तरी सदर कंपनीचा जी आय प्लांट बंद करण्यासाठी खासदार सुनिलजी तटकरे,व पालकमंत्री आदीती तटकरे यांनी महत्वपुर्ण जबाबदारी निभावली असल्याचे सरपंच रणपिसे यांनी उपस्थित पत्रकारांशी बाेलताना सांगितले.