श्रीनिवास बोमनवार
तालुका प्रतिनिधी अहेरी
अहेरी:केंन्द्र शासणाचा,मोदी यांच्या मनमानी मुळे लोकसभेत “शेतकरी विरोधी बील मंजूर केल्यामुळे,”शेतकरी विरोधी केंन्द्र शासणाच्या निषेध असो”मोदी सरकार मुर्दाबाद” शेतकरी विरोधी बील रद्द करा”अशा कांँग्रेस तर्फे घोषणा देण्यात आले.
बिलातील ठळक बाबी:
1) बेरोजगारी: बाजार समितीच्या माध्यमातून लाखो रोजगार उपलब्ध आहेत.ही पद्धत बंद केल्यास देशभरातील लाखो वाहतूकदार व श्रमिक बेरोजगार होण्याची भीती आहे
2) शेतकऱ्यांवर परिणाम: बाजार समित्या बंद केल्यास मोठ्या कंपन्यांच्या निर्णयानुसार मला चा मोबदला मिळेल व तो कंपन्यांच्या निर्णयानुसार कमी-जास्त असेल जवळ शेतकऱ्यावर अन्यायकारक राहील.शेतकऱ्यांनी बाहेर कुठे माल विकला तर त्याला आधारभूत मूल्याच्या कमी भाव मिळण्याची शक्यता आहे.
3) महागाई: जीवनावश्यक वस्तू विधेयक कायद्यामध्ये दुरुस्ती केल्यास व्यापारी वर्ग माल अधिक प्रमाणात साठवून ठेवण्याची शक्यता आहे त्याला कुठल्याही शिक्षेची तरतूद नाही, या साठेबाजी मुळे सामान्य नागरिकांना महागाईची झळ पोहोचू शकते.मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी मौजा-आलापल्ली येथे विरबाबुराव चौकात अहेरी तालुका कांँग्रेस /युवक तालुका कांँग्रेस ,चे अध्यक्ष मुश्ताक हकीम ,रज्जाकखाँ पठाण,रुपेश बंन्देला ,रोहीत चेर्लावार,शुभंम भुपेल्लीवार,बहुतेक कांँग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते!