सतिश मवाळ मेहकर
महाबीजकडून सोयाबीन बियाणे घेतलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी दुबार पेरणी करावी लागली बियाणे न उगवल्याने शेतकर्याचे नुकसान झाले असून त्यांना अद्याप महाबीज कंपनी कडून नुकसानभरपाई मिळाली नाही महाबीजच्या दिरंगाई मुळे शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रतिक्षा करावी लागत आहे.यावर्षी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे महाबीज मंडळाकडून घेतलें आहे.मेहकर तालुक्यातील ग्रामपंचायत सारसीव येथील शेतकरी मनिष जाधव यांनी महाबीज कंपनीच्या सोयाबीन बियाणे घेतलें होतें परंतु सोयाबीन बियाण्याची उगवण झाली नसुन चार एकर शेती खाली राहीली .कॄषी विभागाने पंचनामा करून महाबीज कंपनीच्या सोयाबीन बियाण्यामध्ये दोष असल्याचे स्पष्ट केले होते परंतु अद्यापही शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत आजपर्यंत मिळाली नाही. 25सप्टेबर रोजी महाबीज बियाणे महामंडळ व्यवस्थापकीय अध्यक्षांना निवेदन देऊन महाबीज मंडळाकडून ऐकरी पन्नास हजार रुपये देण्याची मागणी केली आहे न दिल्यास 15अॉक्टबर रोजी महाबीज महामंडळ बुलढाणा येथील कार्यालयात जाऊन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.