राजअनिल पोचमपल्लीवार
विदर्भ उपसंपादक गडचिरोली
गडचिरोली/एटापल्ली – एटापल्ली शहरात २६ सप्टेंबर पासून सुरू झालेल्या जनता कर्फ्युला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव व कोरोना बाधित रुग्णनांची संख्या वाढत असल्याने कोरोना रुग्णनांची साकळी तोडण्याकरिता तालुक्यातील व्यापारी संघटना, नगरपंचायत, सामाजिक संघटना व गावकरी तर्फे दि.२६ सप्टेंबर ते दि.३० सप्टेंबर पर्यंत, पाच दिवसांचा जनता कर्फ्यु पाळण्याची निर्धार केला आहे.
या अनुषंगाने एटापल्ली शहरात रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेत शहरवासीयांना जनता कर्फ्यु मध्ये सहभागी होऊन सहकार्य करण्यास व्यापारी संघटना, नगरपंचायत, सामाजिक संघटना तर्फे आव्हान करण्यात आले होते.या जनता कर्फ्यु मध्ये रुग्णालय, औषधालाय,पेट्रोल पंप व सर्व शासकीय कार्यालय सुरू ठेवण्यात आले आहे.या व्यतिरिक्त संपूर्ण बाजार पेठ बंद ठेवण्यात आले आहे.एकंदरीत जनता कर्फ्युचा पाच दिवस यशस्वी झाल्याचे दिसून येते आहे.