विकास खोब्रागडे
जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
चंद्रपूर/- चिमूर तालुक्यातील मासळ पळसगांव पेटगांव कडे जाणाऱ्या मार्गाचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र काही महिन्यातच निर्माणधीन रस्ताला मोठ मोठे खड्डे पडले आहेत.त्यामुळे या अगोदरचा रस्ता बरा होता,असे म्हणण्याची वेळ आली आहे.या रस्त्यावर जडवाहतुकीची व मोठया वाहनांची नेहमी वर्दळ असल्याने सदर रस्ता पुन्हा उखडला असून रस्त्यावर खड्डे पसरले आहे.यामुळे वाहनधारकांना वाहन चालवणे मुश्किल झाले आहे.खडी आणि डांबराचा अत्यंत कमी वापर करण्यात आल्याने रस्ता ला खोल खड्डे पडले आहे त्या रस्त्याची दुर्दशा होऊ लागली आहे. संबंधित विभागाने या रस्त्याच्या कामाची पाहणी करून रस्त्याचे काम चोख करून घ्यावे अशी मागणी होत आहे.