सचिन राऊत /ग्रामीण प्रतिनिधी वनखी
ठाणेगाव : 05 आॅक्टोंबर, ठाणेगाव,वासाळा, वनखी चामोर्शी या परिसरात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे धानपीकाला मोठा फटका बसलेला आहे. शेतामधील धानपीक आडवी पडल्याने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या परिसरातील शेतशिवारामध्ये आडवे पडलेल्या धानपिकांचे सर्वे करून पंचनामे कृषी सेवक कुंभारे, तलाठी करंबे, कोतवाल विनोद राऊत यांनी आज केले.
ठाणेगाव, वासाळा, वनखी, चामोर्शी या भागात मागील बुधवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे बळीराजाचे अतोनात नुकसान झाले. सद्यस्थितीत धानपीकावर करपा, तुडतुडा रोग सतावत आहे. त्यातच वादळी पावसाने धान आडवे पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.