गजानन तुपकर
जिल्हा प्रतिनिधी – बुलडाणा.
बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव माळी (ता. मेहकर ) येथील कोराडी प्रकल्पावर पुराच्या पाण्यात अडकलेल्या युवकांना वाचवण्यासाठी गेलेल्या स्व. विजय सुरुशे यांना विरमरण आले. दि. 21 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीने देऊळगाव माळी येथील कोराडी प्रकल्पाचा सांडवा ओसंडून वाहत होता. या वाहत्या प्रवाहात पोहण्यासाठी गेलेले गावातील काही मुले वाहुन जात असल्याचे स्व. विजय सुरुशे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता वाहत्या प्रवाहात उडी मारली. आपल्या जिवाची बाजी मारून त्यांनी वाहत जाणार्या मुलांचे प्राण वाचविले परंतु यामध्ये विजय सुरुशे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. समाजासाठी पतीचे अकाली जाण्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीने कुटुंबाला आधार देण्यासाठी शासनाने मला शासकीय नोकरीमध्ये सामावून घ्यावे, कुटुंबाचा आधार गेल्यामुळे आर्थिक विवंचना लक्षात घेऊन 20 लक्ष रुपयांची मदत करावी व माझ्या पतीने स्वतः च्या प्राणाची पर्वा न करता तिन जणांचे प्राण वाचविले त्याबद्दल त्यांना मरणोत्तर उचित पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे जेणे येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळेल. अशी मागणी श्रीमती रुपाली विजय सुरुशे यांनी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यावेळी सचिन मगर ठेकेदार, किसन बळी अंकल, उपसरपंच विनोद फलके, रवी पाटील, वैभव मगर म. पो., संजय बोरकर उपस्थित होते.