शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या अन्यथा मंत्र्यांना दिवाळी गोड जावू देणार नाही – राणा चंदन.
अविनाश डव्हळे,
तालुका प्रतिनिधी लोणार
१९ ऑक्टो.२०२० लोणार :- मागील काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या परतीच्या अवकाळी पावसाने लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले परंतु अद्यापही तालुका प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचे पंचनामे करण्यात आलेले नाही, तसेच प्रशासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे शेतकरी विनाकारण भरडल्या जात आहे त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज लोणार तहसील कार्यालयावर विदर्भ कार्यअध्यक्ष राणा चंदण व जिल्हाअध्यक्ष डाॕ.ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आले.यावेळी नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांसह धडक देत ‘स्वाभिमानी’च्या वतीने प्रचंड घोषणाबाजी करत आक्रोश करण्यात आला व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. जर सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ मदत दिली नाही तर येणारी दिवाळी ही मंत्र्यांना गोड जावू देणार नाही,असा इशारा ‘स्वाभिमानी’चे युवा विदर्भ कार्याध्यक्ष राणा चंदन यांनी दिला.आंदोलन आक्रमक होतांना पाहून पोलिसांनी ‘स्वाभिमानी’च्या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.यावेळी ‘स्वाभिमानी’चे अल्पसंख्यांक आघाडी चे जिल्हाध्यक्ष शे.रफिक शे.करीम, लोणार तालुकाध्यक्ष सहदेव लाड, तालुका उपाध्यक्ष सुनील मोरे, मेहकर तालुका अध्यक्ष नितीन अग्रवाल,तालुका उपाध्यक्ष गणेश जुनघरे,देवेंद्र आखाडे, सतीश वाघ, मेहकर शहराध्यक्ष सदाशिव वडुळकर , मेहकर शहर अध्यक्ष अल्पसंख्याक आघाडीचे अशफाक शहा,धीरेंद्र चव्हाण, संजूभाऊ धावडे, सनाउल्लाह शहा, गणेश मोरे, योगेश सोनुने,यांच्यासह मोट्या संख्येने शेतकरी व ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते सहा उपस्थित होते.