तनुज बल्लेवार
तालुका प्रतिनिधी एटापल्ली
गडचिरोली|एटापल्ली:आलापल्ली-एटापल्ली-पाखांजुर छत्तीसगड हा ११५ किमीचा मार्ग आहे.महाराष्ट्र-छत्तीसगड या दोन राज्याला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने या मार्गाला राष्टीय महामार्गचा दर्जा द्यावा, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख राजगोपाल सुल्वावार यांनी केली आहे.साकोली(भंडारा)-सिरोंचा(गडचिरोली) या मार्गाला राष्टीय महामार्गाचा दर्जा दिला आहे,या मार्गावरून तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू या राज्याचे जड मालवाहू वाहन चालत असतात.आलापल्ली-एटापल्ली हा मार्ग पुढे जाऊन छत्तीसगड राज्याचा पाखांजुरला जोडतो त्यामुळे या मार्ग सुध्दा महत्त्वाचे आहे.हैद्राबाद-रायपूर या मार्गाचा प्रवास सध्या गडचिरोली-देसाईगंज-साकोली मार्गाने केल्या जात आहे,हे अंतर ६०२ किमी पडते,परंतु वरंगल(तेलंगणा)-सिरोंचा-आलापल्ली-एटापल्ली(गडचिरोली)-पाखांजुर(छत्तीसगड) या मार्गाने प्रवास केल्यास केवळ ४५० किमी अंतर पडते. त्यामुळे एटापल्ली मार्ग महत्त्वाचा ठरतो,म्हणून या मार्गाला राष्टीय महामार्गाचा दर्जा द्या अशी मागणी सुल्वावार यांनी जिल्हाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा कडे केली आहे.