राम भोस्तेकर
विभागीय उपसंपादक कोकण
जीवघेण्या कोरोना व्हायरस ने जगभरात थैमान घातलेले असताना शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याकरिता लॉकडाऊन केले,महिनोंमहिने असणाऱ्या लॉकडाऊनमुळे हजारो रोजगार तर गेलेच परंतु सर्वसान्यांनी बचत केलेली जमापुंजीदेखील संपली,आणि त्यातच भरीत भर म्हणुन कोकणात आलेल्या निसर्गचक्रीवादळाने सर्वसामान्यांवर शेवटचा प्राणघातक आघात केला.सध्या जनतेने स्वप्न पाहणे,कामाचा विस्तार करणे हे ध्येय,स्वप्न सोडून दिलेले असून दोन वेळच जेवण कस करता येईल आणि आजारी पडल्यास उपचार कसे घेता येतील हेच एकमेव उद्दिष्ट लोकांसमोर आहे.आणि त्यातच अजून दुष्काळात तेरावा महिना म्हणजे महावितरण ने जनतेला दिलेला जोर का झटका.लॉकडाऊन कालावधीमध्ये जनतेला माहे जानेवारी ते मार्च 2020 या महिन्यांची सरासरी काढून पुढील तीन महिने सरासरी युनिटचे बिल देण्यात आले व ततद्नंतर ऑगस्ट महिन्यात एकूण वापर व त्याचे दिलेले प्रचंड बिल पाहून अनेकजणांना धक्काच बसला.मुळातच किराणा भरायला देखील पैसे शिल्लक नसताना हजारो रुपयांची बिल भरावी लागतील या विचारानेच अनेकांना घाम फुटला.वर्षानुवर्षे वीज वापरत असल्याने प्रत्येकाला आपले दरमहा बिल जास्तीत जास्त किती येऊ शकते याचा अंदाज असतो त्यामुळे अचानक वाढलेला वीजबिलाचा आकडा अनेकांच्या पचनी न पडल्यामुळे लोकांनी महावितरण केंद्रात धाव घेतली परंतु तिथे कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण न देता आलेले बिल भरावेच लागेल अशी उत्तर मिळत आहेत. शेतकरी कामगार पक्षाने या आधीच लॉकडाऊन काळातील वाढीव वीजबिले माफ व्हावीत यासाठी मा. अस्लमभाई राऊत,तालुका चिटणीस रमेश मोरे यांच्या नेतृत्वामध्ये तहसील व महावितरण कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आले होते व प्रसंगी आंदोलनाचा इशारादेखील देण्यात आला होता,परंतु तरीदेखील वीजग्राहकांना कोणताही दिलासा न मिळाल्यामुळे व महावितरण च्या आडमुठ्या धोरणामुळे जनतेला झटका देऊन झालेल्या महावितरणलाच झटका देण्यासाठी युवा नेते निलेश थोरे यांनी आपण सोमवार दिनांक 07/09/2020 पासून मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचे कळविले आहे.जोपर्यंत जनतेला आलेल्या चुकीच्या बिलांची दुरुस्ती होत नाही तसेच इतर मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आपण जनतेच्या हक्कासाठी अखेरपर्यंत लढून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले.आलेल्या वीजबिलामध्ये अनेक नागरिकांनी मागील बिले भरून देखील ऑगस्ट महिन्यात मागील महिन्यांचे बिल देखील वाढवून आले आहे,तसेच माहे एप्रिल 2020 पूर्वीच्या दराप्रमाणे वापरलेल्या युनिट्स चे बिल देखील वाढीव दराने लावले असून स्थिर आकार चा दर चक्रीवादळ काळात घेत नसल्याचे जाहीर करूनही जून महिन्याचा स्थिर आकार ग्राहकांच्या माथी मारले आहेत.आदिवासी बांधवाना बीपीएल अंतर्गत अत्यल्प दरात वीजदेण्याचा नियम असताना देखील त्यांच्याकडून जास्त बिल आकारले गेले आहे.तसेच अनेक आदिवासी बांधव व दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांना बीपीएल चा लाभ मिळू नये याकरिता वीजभार मंजूर करताना जाणीवपूर्वक केवळ 10 व्हट भार अतिरिक्त वाढवून त्यांना मिळणाऱ्या लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रकार जाणीवपूर्वक केलेला असल्याचे दिसून येत आहे.गेले वर्षानुवर्षे ही फसवणूक अशीच चालू असल्याने ग्राहकांची एकप्रकारे लूट होत आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही यामुळे या सर्व गोष्टींमध्ये शासनाने हस्तक्षेप केल्याशिवाय नागरिकांना न्याय मिळणार नाही अशी भावना जनसामान्यांमध्ये आहे व तीच भावना शासनापर्यंत पोहोचविण्याकरता आपण ठिय्या आंदोलन करणार असून जनतेला न्याय देण्यासाठी प्रसंगी बलिदान द्यावे लागले तरी चालेल पण मागे न हटता महावितरण कडून मागण्या मान्यच करून घेणार असल्याचे युवानेते निलेश थोरे यांनी म्हंटले आहे.दरम्यान वीजबिलामुळे त्रस्त झालेल्या माणगावकर नागरिकांमध्ये ह्या आंदोलना मुळे उत्साह निर्माण झाला असून सोशल मीडियावर सदर आंदोलनाची प्रचंड चर्चा आहे,त्यामुळे माणगावकर ह्या आंदोलनास उस्फुर्त प्रतिसाद देतील ह्यात तिळमात्र शंका नाही.शेतकरी कामगार पक्ष हा नेहमीच छोटे व्यापारी सर्वसामान्य,गोरगरीब जनता ह्यांच्या साठी लढा देत असून सदर आंदोलन हे दक्षिण रायगड चे शेकाप नेते अस्लम राऊत,जी.प.सदस्य आरती मोरे,तालुका चिटणीस
रमेशमोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच मोरबा सरपंच .नाझनीन राऊत,तालुका सहचिटणीस राजेश कासारे,जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य नामदेव शिंदे,निझाम फोपळूणकर,अमोल मोहिते,ख.वि.संघाचे जेष्ठ संचालक बाळकृष्ण आंबुर्ले अण्णा,जेष्ठ नेते अनंता थळकर,मागासवर्गीय सेल अध्यक्ष संजय गायकवाड,सरपंच दिनेश गुगळे,उपसरपंच स्वप्नील सकपाळ,संचालक दामू बटावले नितीन वाघमारे,माणगाव शहरअध्यक्ष अभिजित शेठ,मधुकर अर्बन,जेष्ठ कार्यकर्ते गोविंद पवार,अजय उभारे,नंदकुमार डवले,नितीन लाड,सखाराम जाधव,प्रशांत मोरे,किशोर गावडे,विलास मोरे,अंकित कदम,प्रफुल भादावकर,तौसिफ़ करदेकर,प्रदीप लांगे,संदीप गोसावी,प्रमोद भादावकर, गणेश उभारे,नितेश गायकवाड, मारुती सांगले व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी व माणगावचे नागरिक यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. दरम्यान प्रत्येक संकटाला माणगावसाठी धावून येणाऱ्या युवा नेत्याच्या ह्या आंदोलनानंतर तरी जनतेला महावितरण न्याय देणार का ही उत्सुकता नागरिकांना लागली आहे.