योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
नागभीड (०७ नव्हें.) – ग्राम पंचायत चा कारभार सुरळीत होण्यासाठी सरकारने प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये आपले सरकार सेवा अंतर्गत संगणक परिचालक नियुक्त केले आहे. आज पर्यंत त्यांचे मानधन हे दोन टप्प्यात १४ वा वित्त आयोग योजनेतून झाले आहेत. मात्र यावर्षी १५ वा वित्त आयोग अंतर्गत आपले सरकार सेवा केंद्र ला एकूण १४७३३१ रुपये इतका ग्रामपंचायत ला एकाचवेळी भरणा करावे लागत असून ग्रामपंचायत कडे नंतर कुठलाही निधी शिल्लक राहत नाही व उरलेल्या निधीमध्ये जाचक अटी असल्याने तो पैसा खर्च कसा करायचा हा एक गंभीर विषय आहे. आपले सरकार केंद्राचे पैसे एकाचवेळी देऊनही संगणक चालकांचे मानधन ६०००/- रुपये असून ते पण बरीच महिने होत नाही व उरलेला निधी नेमका कशावर खर्च होतो. यामध्ये आपल्या सरकार सेवकेंद्रातर्फे रीम, टोनर, संगणक दुरुस्ती यापैकी इतर कुठल्याही सुविधा पुरविल्या जात नाही, तर ग्रामपंचायतीने इतका भुर्दंड का म्हणून सहन करावा, त्याचप्रमाणे १४ वा वित्त आयोगाचा खर्च व देखभाल दुरुस्तीची माहिती पंचायत समिती कडून मागविण्यात आलेली आहे, व उपोषणाचा ईशारा पण देण्यात आलेला आहे. सरपंच तालुका सेवा महासंघातर्फे संजय गजपुरे जि प सदस्य चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले आहे.यावेळी सरपंच सेवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री हेमराज लांजेवार, अमोल बावनकार उपाध्यक्ष सरपंच महासंघ तालुका नागभीड उपस्थित होते.