अनिल ठोकळ, विदर्भ संपादक
शेतकऱ्यांना तात्काळ रोहित्र उपलब्ध करून द्या व लॉकडाऊन काळातील विजबिल माफ करा
बुलडाणा : दि.२० नोव्हेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुलडाणा येथील अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनाला विदर्भ कार्याध्यक्ष राणा चंदन व जिल्हाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वाखाली सुरवात झाली आहे. गेल्या काही दिवसाआधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजु शेट्टी व राज्याचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वामध्ये राज्यव्यापी विद्युत वितरण कंपनीला टाळे ठोको आंदोलन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने राज्य सरकारच्या वतीने तोडगा काढण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र राज्यामध्ये सध्या कोरोनाच्या साथीमुळे तसेच परतीच्या पाऊसामुळे शेती पिकाचे फार मोठे नुकसान झाले व कोरोनामुळे सर्व व्यवसाय, उद्योगधंदे व मजुरांना काम नसल्यामुळे सामान्य नागरिकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला. असा परिस्थितीमध्ये शेतकरी व विज ग्राहक हा आर्थिक अडचणीत सापडला असून तो विजबिल भरू शकत नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातील संपूर्ण विजबिले राज्य सरकारने माफ करावे. तसेच खरीप शेती पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे आता रब्बी पिकसुद्धा. ऑईल तुटवडा असल्यामुळे विद्युत रोहित्र मिळत नाही त्यामुळे पिके वाळत आहेत. शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या विरोधात रोष वाढत चालला आहे. मात्र सरकार सहकार्य करायचे सोडून नुसते बघ्याची भूमिका घेत आहे. बऱ्याच गावातील शेतकरी स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर मध्ये तक्रारी घेऊन येतात त्यामुळे. रविकांत तुपकर यांनी २ दिवसापूर्वी घोषणा केली की शेतकऱ्यांना तत्काळ विद्युत रोहित्र देण्यात यावे व विजबिले माफ करण्यात यावी अन्यथा विद्युत वितरण कंपनी व सरकारच्या विरोधात विजबिल माफी व रोहित्र मिळे पर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलनाची सुरवात बुलडाण्यामधून करण्यात आली यावेळी स्वभिमानीचे विदर्भ कार्याध्यक्ष राणा चंदन, जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले, शे. रफिक शे. करीम, नितीन राजपूत, हरिभाऊ उबरहंडे, विनायक सरनाईक, रामेश्वर वायाळ, योगेश सोनुने, बबनराव चेके, पवन देशमुख, राजू कारले, सुभाषराव अवकाळे, भगवान गावंडे, प्रभाकर म्हस्के, शेषराव गवते, माळशेंबा, व पळसखेड येथील शेतकरी उपस्थित होते.