संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया.
नवेगावबांध दि.3 डिसेंबर:-
अर्जुनी/मोर सम्पूर्ण तालुक्यात अनियमित पाऊस आणि हवामाना मुळे शेतकरयाच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले.अश्या परिस्थिति मध्ये रब्बी हंगामात दुबार पेरणी करुण मिळालेल्या उत्पादनातुन झालेले नुकसान भरून काढण्यासाठी नवींन पिक घेण्या करिता वीजेची अतोनात गरज असते.अश्या गंभीर आणि जीवघेणे संकटाच्या काळात शासना कडून शेतकऱ्यांना मोटार पंप चालविन्या साठि फ़क़्त 8 तास विज पुरवठा ते सुद्धा रात्रि 12 वाजता देत असल्यामुळे, धान उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने आज (3डिस.20) ला तब्बल 800 शेतकरयाच्या उपस्थिति मध्ये शेतीचे पंप चालविन्या साठि 24 तास विद्युत पुरवठा मिळावा,शेतकरयांचे थकित विज बिल माफ करावे,नवींन विज कनेक्शन लवकर देण्यात यावे, कृषि मालाला योग्य हमीभाव देण्यात यावा,इटीयाडोह मुख्य कालव्या वरील लाभ धारक प्रवाही व उपसा सिंचन व रब्बी हंगामात पानी देण्यात यावे असे मांगनी करणारे निवेदन उपविभागीय अधिकारी अर्जुनी/मोर,विद्युत उपविभागीय अभियंता ,तहसिलदार अर्जुनी/मोर ,यांना देण्यात आले. 4 दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास हजारो च्या संख्येत शेतकरी विद्युत विभागा समोर ठिया आंदोलन करणाऱ असल्याचे माजी नगराध्यक्ष किशोर सहारे यानी सांगितले.निवेदन देण्या करिता गडचिरोली येथील सामाजिक कार्यकर्ता सुरेंद्रसिंह चंदेल ,कुरखेडा नगराध्यक्ष महेंद्रकुमार मोहबंसी,अश्विनसिंह गौतम,संजय देशमुख,प्रशांत किलनाके,राधेश्याम झोळे,रत्नाकर बोरकर,सोनदास गनवीर,विनोद गहाने,दीपक सोनवाणे,अशोक कापगते, व मोठ्या संख्येत शेतकरी उपस्तित होते.शेतकरयांनी एक जुटिने उभे राहुन आपले हक्क मागावे वेळे प्रसंगी गडचिरोली जिल्ह्याचे शेतकरी पाठिम्बा द्यायला येणार असल्याचे चंदेल यानी आपले मत व्यक्त करताना सांगितले.