योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
नागभीड (०८ सप्टेंबर)- सिंचाई विभाग घोडाझरी तलावा अंतर्गत येत असलेल्या गोविंदपुर व नवरगांव मायनरवर सन १९८९ पासुन पाणी वाटप काम करणाऱ्या ४० ते ५० हंगामी मजुर कामगारांना कामावरती घेण्याबाबत होमदेवभाऊ मेश्राम माजी भाजपा तालुका अध्यक्ष नागभीड यांनी निवेदन दिले असता कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग चंद्रपुर यांनी अनेक वर्षापासुन काम करणाऱ्या हंगामी मजुरांना प्राधान्याने घोडाझरी तलावाचे गोविंदपुर व नवरगांव येथील मायनरचे पाणी वाटपावर हंगामी मजुरांना कामावर घेण्याचे आश्वासन दिलेत .यावेळी परीश शेंडे उपसरपंच नांदेड,आशीष खोब्रागडे, दौलत वाघाडे,दादाजी कोसे,देविदास गेडाम, किर्तीजय मेश्राम, सुधाकर गेडाम, गुरुदास कन्नाके,पांडुरंग राऊत,सुभाष जांभुळे,गोविंदा परचाके तसेच गोविंदपुर,येनोली माल,नवरगांव तसेच परीसरातील अनेक हंगामी मजुर उपस्थित होते.