विजय शेवाळे
तालुका प्रतिनीधी/परंडा
परंडा :दि.16डिसेंबर परंडा तालुक्यातील धोत्री येथील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. धोत्री हे गाव उस्मानाबाद जिल्हयाच्या सरहद्दीवरील गाव असुन हे गाव पश्मिम महाराष्ट्र म्हणजे उस्मानाबाद ,सोलापुर व अहमदनगर या तिन्ही जिल्हाच्या सरहद्दीवर आहे ह्या गावाला पश्चिम महाराष्ट्र म्हणजे करमाळा व जामखेड या ठिकाणी मोठी बाजारपेठ असल्यामुळे लहान मोठ्या वाहनांची जास्त वर्दळ असते परंतु रस्तामध्ये छोटे – मोठे खड्डे असल्यामुळे लहान – मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. तरी या गावाची लोकसंख्या अदांजे ९५० असुन या गावाला रस्ता खराब असल्यामुळे आतापर्यंत बससेवेचा लाभ येथील ग्रामस्थांनी घेतलाच नाही.फक्त निवडणुकीच्या काळामध्ये या गावाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी येतात व मतदानापुरते लक्ष दिले जाते इतर वेळेस कोणतेच लोकप्रतिनिधी या गावाला ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी येत नाही. तरी धोत्री गावाचा रस्ता कधी दुरूस्त होईल अशा प्रश्न ग्रामस्थ करीत आहेत.