विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि. २५ डिसेंबर :- कोव्हीड-१९ (कोरोना) आजारावर प्रतिबंध म्हणुन देशात लॉकडाऊन , संचारबंदी करण्यात आली होती. त्याचा मोठा विपरीत परिणाम देशासह राज्याच्या अर्थव्यवस्थेवर तर झालाच मात्र सर्वसामान्य नागरीकांवर सुध्दा झाला. लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या हातचे काम गेले. तर काहींना नाईलाजास्त जिवासाठी स्वतःचे काम सोडावे लागले. शहरामध्ये हातावर पोट असलेल्या पथविक्रेत्यांना तर लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका बसला. पथविक्रेत्यांना लॉकडाऊनमध्ये घरातच राहावे लागले. अशा अनेक घटकांचा पोटापाण्याचा प्रश्न अजुनही सुटलेला नाही. मात्र केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे पथविक्रेत्यांना दिलासा मिळाला असुन ही योजना पथविक्रेत्यांसाठी ‘नवसंजीवनी’ ठरीत असल्याचे चित्र भंडारा शहरांमध्ये दिसुन येत आहे. पथविक्रेत्यांना सहाय्य अभियानांतर्गत ‘आर्थिक सक्षमीकरण…पथविक्रेत्यांचे सबलीकरण…’ करण्यासाठी ही योजना जिल्हयात राबविली जात असुन आज जिल्हयातील २ हजार १७० पथविक्रेत्यांनी या योजनेकरीता आवेदन अर्ज सादर केले. असुन प्रत्येकी १० हजार रूपये अशा जवळपास १ हजारापेक्षा अधिक लाभार्थ्यांना एकुण ९१ लाख ७४ हजार रूपयांचे कर्ज मंजुर करून सदर रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत भंडारा शहरातील ७२५ लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले असुन चारशेच्यावर लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत ३४ लाख ७४ हजार रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले हे विशेष.
कोरोना दरम्यान लॉकडाऊनचा विविध घटकांवर परिणाम झाला. अर्थव्यवस्था डळमळीत झाली. त्यातुन मार्ग काढत एकएक घटकाला उभारी देण्याचे काम चालू आहे. केंद्र सरकारने पथविक्रेता सहाय्य अभियानांतर्गत प्रधानमंत्री स्वनिधी योजना नगरपालीका, नगर पंचायतीच्या माध्यमातून राबविली जात आहे. या योजनेतंर्गत भंडारा जिल्हयाला २ हजार ५२० पथविक्रेत्यांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या योजनेतंर्गत पथविक्रेत्याला ३ टक्के व्याजदरावर १० हजार रूपयाचे कर्ज एका वर्षाच्या मुदतीसाठी बँकेतुन दिले जाते. आणि तेही ७ टक्के अनुदानासह विशेष म्हणजे मुदतीत कर्ज फेडणा-यांना यानंतर वाढीव स्वरूपाचे कर्ज दिले जाणार आहे.
कालावधीत कर्जाची परतफेड केल्यास वाढीव कर्ज फेडल्यास
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतंर्गत एका वर्षाकरीता दिले जाणारे १० हजाराचे कर्ज दिलेल्या कालावधीत फेडल्यास त्या लाभार्थ्यांना नव्याने वाढीव कर्ज दिले जाणार आहे. पथविक्रेत्यानी अशा प्रकारे कर्ज सुविधा उपलब्ध होणार असल्यामुळे पथविक्रेत्याना ‘अच्छे दिन’ आले असेच म्हणावे लागेल.
डिजीटल व्यवहारावर १ हजार २०० रूपये परतावा
१० हजारांचे कर्ज मिळाल्यानंतर पथविक्रेत्याने पूर्ण वर्षभर ऑनलाईन व्यवहार करणे आवश्यक आहे. जो पथविक्रेता ऑनलाईन व्यवहार करेल त्याला १ हजार २०० रूपये परतावा मिळणार आहे. म्हणजे अनुदानाचे ७०० रूपये व १२०० रूपये परतावा असा एकुण १९०० रूपयाचा फायदा हा पथविक्रेत्यांना होणार आहे.
पथविक्रेत्यांना कर्ज वाटप करतांनी बँक आँफ इंडिया, जिल्हा अग्रेणी व्यवस्थापक अशोक कुंभलवार, युनियन बँक व्यवस्थापक गाडेकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी
विनोद जाधव, प्रधानमंत्री स्वनिधी योजना भंडाराचे जिल्हा समन्वयक प्रविण पडोळे उपस्थित होते.
” विशेष म्हणजे मुदतीत कर्ज फेडणा-यांना यानंतरकाळात वाढीव स्वरूपाचे कर्ज दिले जाणार आहे.
कोरोना महामारीमुळे लॉकडऊनच्या काळात अनेकांचे व्यवसाय डबघाईला आले. त्याचा सर्वाधीक फटका हा शहरातील पथविक्रेत्यांना बसला आहे. लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय पुर्णपणे बंद असल्याने जवळ असलेले पैसे कौटूंबिक खर्च झाल्याने आता व्यवसाय कसा करावा असा प्रश्न पथविक्रेत्यां पुढे उभा ठाकला होता. केंद्र सरकारने पथविक्रेत्यांना दहा हजार रूपयांचे अर्थसहाय्य देवुन खरोखर त्यांच्या व्यवसायास पुन्हा उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातील पथविकेत्यांना या योजनेचा लाभ घ्यावा.”
विनोद जाधव,
मुख्याधिकारी न.प.भंडारा
जिल्हयात पथविक्रेत्यांची संख्या ब-यापैकी असुन कोरोना संकटात व्यवसाय पुर्णपणे बंदनव्याने असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले होते. लॉकडाऊन उघडल्यानंतर नव्याने व्यवसाय सुरू करण्यास पथविक्रेत्यांना आर्थिक अडचण भासत होती. मात्र केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री स्वनिधी’ योजनेमुळे पथविक्रेत्यांनी मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हयात आज २ हजार १७० पथविक्रेत्यांनी योजनेअंतर्गज कर्जा करीता आवेदन केले असुन त्यापैकी १ हजाराच्यावर पथवित्यांना जवळपास ९१ लाख ७४ हजार रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. उर्वरित लाभार्थ्यांना लवकरच कर्जाचे वाटप होणार असुन जिल्हयातील फुटपाथ व्यवसायीक व फेरीवाले यांनी पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घेण्याकरीता संबंधीत नगर पालिका भंडारा शहरात आधार शहर उपजिविका केंद्र मिस्कीन टँक गार्डन राजीव गांधी चौक भंडारा येथे पीएम स्वनीधी योजनेचे आवेदन स्विकारण्यात येत असुन शहरातील पथविक्रेत्यांनी सदर योजनेचे आवेदन अर्ज भरण्याकरीता आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड व पासपोर्ट फोटोसह सकाळी १० ते सायं ८ वाजेपर्यंत संपर्क साधावे असे आवाहन प्रधानमंत्री स्वनिधी योजना भंडाराचे जिल्हा समन्वयक प्रविण पडोळे यांनी केले आहे.