सत्याग्रह आंदोलन कार्त्यांनी
केली पत्रपरीषदेत मागणी
विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि.१ जानेवारी :- जिल्ह्यात CBSE शाळा मनमानी व अवैध कारभार विरोधी सत्याग्रह आंदोलनाच्या १५ व्या दिवशी शासकीय विश्राम गृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्या शासना पुढ़े रेटून धरल्या आहेत. नागपूर येथील उपसंचालक कार्यालयाने २४ सप्टेंबरला एक पत्र काढुन भंडारा जिल्ह्यातील CBSE शाळांना मुख्याध्यापक व शिक्षक मान्यता घेण्यासाठी ३१ डिसेंबेर २०२० ही मुदत दिली होती. परंतू सर्वच CBSE शाळानी या आदेशाचे उल्लंघन केले आहे. असा आरोप सत्याग्रह आंदोलकांतर्फे करण्यात आला आहे. CBSE शाळा अवैध पणे चालविणा-या संचालकांवर गुन्हे दाखल करावेत. आज पर्यंत घेतलेली शालेय फी ची रक्कम व्याजासह पालकांना परत करावे. नागपूर व हिंगणघाटच्या २ शाळांवर ११ करोड़ रुपयाची दंड वसूलीची कार्यवाही केली. त्याच प्रमाणे भंडारा येथील शाळांवर सुद्धा अशीच कार्यवाही करावी. ही प्रमुख मागणी या वेळी करण्यात आली.
भंडारा जिल्ह्यातील CBSE शाळांनी बोगस टी.सी. जारी केल्या आहेत. टी.सी. वर अधिकृत हेडमास्टरची सही असणे आवश्यक असते. त्यामुळे प्रचंड मोठे संकट विद्यार्थ्यांच्या भविष्यावर निर्माण झाले आहे.
शिक्षा बचाओ आंदोलनाच्या अंतर्गत सत्याग्रह भंडारा जिल्हा परिषदे समोर सुरु आहे. हजारो पालक व अनेक संघटनांनी जाहिर पाठिंबा या आंदोलनाला दिले आहे हे विशेष.
CBSE शाळा ह्या RTE ACT २००९ नुसार जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अंतर्गत येतात. परन्तु शिक्षणाधिकारी हेतू पुरस्सर ह्या गैरभाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे. येत्या १० दिवसात अवैध कारभार चालविना-या बोगस शाळांवर कार्यवाही न झाल्यास सत्याग्रह आंदोलन अधिक तिव्र करु असा इशारा भंडारा येथील शासकीय विश्राम गृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सत्याग्रह आंदोलनकर्त्यांमार्फत देण्यात आला आहे. पत्रकार परिषदेला शिक्षा बचाओ आंदोलनाचे जिल्हा संयोजक नितीन निनावे, नागपूर विद्यापीठ सिनेट सदस्य प्रवीण उदापूरे, तुमसर प्यारेंट असोसिएशनचे जय डोंगरे, हेमंत बडवाईक, अजय रेहपाडे, किशोर आगलावे, सविता तुरकर, सुनिता सार्वे तसेच विविध CBSE शाळेत शिक्षण घेणा-या विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांचे पालक उपस्थीत होते.