विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि. ११ जानेवारी:-भंडारा तालुक्यातील आंबाडी येथील गट ग्राम पंचायतीच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतांना आंबाडी येथील 35 वर्षीय जितेंद्र वसंत गजभिये या युवकाचा पालगाव सीमेवरील राज्य महा मार्गलगतच्या शिवारात गंभीर जखमी अवस्थेत मृत आढळल्याने प्रचंड चर्चेला ऊत आलेला आहे.
आंबाडी , पालगाव व गिरोलागट ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूक – २१ प्रचार अहोरात्र गाड्याघोड्याच्या व लाऊडस्पीकरच्या गजरात प्रचाराचा वेग सुरू असल्याने लोकजागर सुरु आहे. मागील ग्राम पंचयत निवडणुकी नंतर उपसरपंचाचा ही संशयास्पद अपघात झाला होता. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने सर्वत्र परिसरात उलटसुलट चर्चेला उत आला आहे. आज आंबाडी ग्राम पंचायत अंतर्गत नेहरु वार्डातील 35 वर्षीय निवासी जितेंद्र उर्फ सेंग्या वसंत गजभिये हे मध्यरात्री नंतर पहाटेच्या सुमारास घराबाहेर पडल्याचे सांगितले जाते. मात्र सकाळी पालगाव परिसरातील राज्य महामार्गा लगतच्या शिवारात डोक्याला व पायाला जब्बर मार लागलेल्या मृत अवस्थेत पडलेला असल्याचे आढळल्याची माहिती पालगावचे पोलीस पाटील भगवान साखरवाडे यांनी कारधा पोलीस स्टेशनचला दिली. यावरून कारधा पोलीस स्टेशनच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी पोहचून जितेंद्र गजभिये यांचे मृत शरीर शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे हलविण्यात आहे. व पुढील तपास कारधा पोलीस स्टेशनअंतर्गत करण्यात येत आहे.