तब्बल दहा महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शाळा सुरू
योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
चंद्रपूर (२७ जाने.)- चंद्रपूर जिल्ह्यात आजपासून ५ वी ते ८ वी चे वर्ग सुरू होणार असून तब्बल दहा महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शाळेची घंटा वाजणार आहे. पुन्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा गजबजून जाणार आहे.गतवर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे मार्च महिन्यापासून जिल्ह्यातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या होत्या. दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रकोप पाहून शासनाने अॉनलाईन शिक्षण सुरू केले होते. तीन महिन्यापूर्वी ९ वी ते १२ वी चे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने टप्प्याटप्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.