सूर्यकांत वाघमारे
जिल्हा प्रतिनिधी लातूर.
लातूर/ दिनांक 7 रोजी वार सोमवार या दिवशी विनायक एकनाथ सोनवणे यांच्या दोन म्हशी चोरट्याने लंपास केल्या आहेत. या शेतकऱ्यावर आज उपासमारीची वेळ आली आहे. अगोदरच पावसाने दडी दिल्याने आणि त्यातल्या त्यात सोयाबीनची उशिरा पेरणी आणि आत्ता सध्या सोयाबीन ला कमी प्रमाणात शेंगा आणि दुष्काळात तेरावा महिना म्हणजे, त्या शेंगा वर ही रोग पडलेला आहे. मग आपला गुजारा करण्यासाठी कुटुंब चालवण्यासाठी विनायक एकनाथ सोनवणे यांनी काही दिवसांपूर्वी दोन म्हशी विकत घेतल्या होत्या जेणेकरून दुधाच्या माध्यमातून काही मोबदला मिळेल व आपला संपूर्ण उदरनिर्वाह दुधावर चालेल अशा या गरीब शेतकऱ्याने दोन म्हशी विकत घेतल्या होत्या पण कोनी तरी नजर ठेवून विनायक सोनवणे घरी आल्यानंतर रात्री दोन म्हशी चोरून घेऊन गेल्या. आज या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे जवळपास या दोन म्हशी ची किंमत एक लाख 50 हजार रुपये आहे तरी विनायक एकनाथ सोनवणे यांनी चाकुर पोलीस स्टेशन येथे रीतसर तक्रार देऊन त्याची पोहोच घेतलेली आहे. आता या पुढील तपास जानवळ चे बीट जमादार राक साहेब करत आहेत.