विकास खोब्रागडे
जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर
चंद्रपुर /- चिमूर क्रांती बाबत आपणांस काही सांगण्याची गरज नाही.आपणांस 1942 क्रांती बाबत चांगली माहिती आहे.परंतु ज्या भारत देशाला चिमूर च्या भुमीने 1942 ची क्रांती घडवून स्वातंत्र मिळवून दिले, त्या क्रांती भूमीची त्या शहिदांची ओळख आपल्या चंद्रपूर जील्ह्याबाहेर हजारातुन एखाद्याला आहे.माझा उद्देश स्पष्ट असून कोणताही राजकारण करण्याचा नाही.चिमूर क्रांती भूमी ची व शहिदांची ओळख देश पातळीवर व्हावी, येथिल शहीद विरपुत्रांना देश स्तरावरील सन्मान मिळावा या करिता सरकार चे लक्ष वेधण्यासाठी आणि जनतेला क्रांती भुमीचे महत्व कळावं करिता मी दिनांक 19/02/2021 रोज शुक्रवार ला एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करीत आहो.तरी सुद्धा “ताकाला जायचं अन् भांड लपवायच” असे मी करणार नाही. उपरोक्त कार्य करतांना स्थानिक नगर परिषद मधुन काही महत्वाचे ठराव करणे आवश्यक आहे. दिलेल्या निवेदनाचा पाठ पुरावा शासन दरबारी करणे आवश्यक आहे. तसेच हे कार्य करण्यासाठी त्या व्यक्तीच्या नसानसात व रक्तातील थेंबा थेंबात काम करण्याची हिंमत, त्याग आणि निस्वार्थी वृत्ती, निर्व्यसनी तसेच सेवेची भावना असणे आवश्यक आहे. तद्वतच विषयाचा अभ्यासही असणे गरजेचे आहे. वरील कार्य चिमुरकरांसाठी गौरवाची व स्वाभीमानाची बाब आहे. चिमूर क्रांती भूमीला व शहिदांना सन्मान कसा मिळवून द्यायचा देश पातळीवर चिमूर क्रांती व शहिदांची ओळख निर्माण करण्याकरिता एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत