राजअनिल पोचमपल्लीवार
विदर्भ उपसंपादक गडचिरोली
आलापल्ली – आलापल्लीतील नवनिर्वाचित युवा सरपंच शंकर मेश्राम यांचा गावाचा विकास, दक्षता, स्वच्छता या ना विविध काम कुणाची वाट न पाहता सुरवात केल्याने गावातील लोकांमध्ये चर्चेचे विषय ठरत आहेत.
अहेरी विधानसभा क्षेत्रातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आलापल्ली म्हणून बोलला जातो. राजकारणाची सुरुवात इथूनच होतो. पण आलापल्ली ग्रामपंचायत ना ना विविध समस्येंनी ग्रासलेली आहे. जो निवडून येतो फक्त अश्वानावरच. एवढ्या मोठ्या ग्रामपंचायतीला सांभाळणे म्हणजे एकप्रकारचे कसरतच करावे लागतो. खुर्चीवर बसल्यानंतर काय करावे किंवा कसा करायचे हे समजण्यासाठी च 5 वर्ष लागतात असे म्हणतात पण याला अपवाद नवनियुक्त युवा सरपंच शंकर मेश्राम ठरतो आहे. पहिल्या दिवशीच कचरा साफ करण्याचा ट्रॅक्टर ड्राइवर चा अनुपस्थितीत सफाई कर्मचाऱ्यांना घेऊन स्वतः ट्रॅक्टर चालवीत पूर्ण गाव स्वच्छ करीत स्वच्छतेचा संदेश दिला. त्यातच त्यात आज आलापल्ली ग्रामपंचायतीतील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना घेऊन गावातील नादुरुस्त, बिघाड झालेल्या 15 हातपंप पैकी 6 हातपंप दुरुस्त करावयास लावले तसेच उर्वरित हातपंप येत्या दोन दिवसात दुरुस्त करणार असल्याचे सांगितले. येत्या उन्हाळा पाण्याची टंचाई भासू नये, लोकांची गैरसोय होऊ नये याची दक्षता घेत विकासकामाला पहिल्या दिवसापासून च सुरुवात केली. यामुळे जनतेत प्रशंसा चे पात्र ठरत आहेत.