प्रदीप घाडगे मुख्य संपादक
पवनी : निबंध स्पर्धेच्या पेपरात छत्रपती शिवाजीचे बालपण उतरवायची तल्लीनता, टीम घेऊन तयार केलेले गडकिल्ले व सादरीकरण, उपस्थितांचा जयघोष व जिकडे तिकडे भगवे फेटे धारी हे दृश्य पाहुन हिंदवी स्वराज्य उभे राहिल्याचा अनुभव संभाजी चुटे पवनीच्या रंगमंचाच्या प्रांगणात आला.
भारतीय जनता पक्ष/युवा मोर्चा पवनी तालुका तर्फे “शिवजयंती” औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा व खुल्या वर्गात गडकिल्ले स्पर्धा घेण्यात आली. निबध स्पर्धेत ४४३ विद्यार्थी व ५९ गडकिल्ले व त्यांच्या टिम सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहभागी विद्यार्थ्याची बसण्याची,जेवण व पाण्याची व्यवस्था केली होती. गडकिल्ले परिक्षक म्हणून छोटा भिमचे व विविध कलाकृतीचे निर्माते प्रा.डाॅ.निलेश चव्हान होते. निबंध परिक्षक म्हणून सगळ्या शाळा, महाविद्यालय व कान्हेटचे शिक्षकांनी मदत केली. निबंध स्पर्धा विजेता अ गटातील पहिले बक्षिस हिमानी गेंदलाल मानापुरे वैनगंगा विद्यालय पवनी, दुसरे तृप्ती पुरुषोत्तम मानापुरे वैनगंगा विद्यालय पवनी, तिसरे अनघा पंकज तलवारे वैनगंगा विद्यालय पवनी यांना देण्यात आले.निबंध स्पर्धा विजेता ब गटांमध्ये पहिले प्रकाश बोरकर नगरपालिका विद्यालय पवनी, दुसरे रोशन नागपुरे नगरपालिका विद्यालय पवनी, तिसरे चंद्रशेखर गिरेपुंजे वैनगंगा विद्यालय पवनी यांना तर गड किल्ले प्रतिकृती निर्मिती स्पर्धा विजेता
पहिले रितिक किशोर मेश्राम नगर परिषद विद्यालय पवनी,दुसरे अभिषेक अरविंद मेश्राम वैनगंगा विद्यालय पवनी तिसरे अभिरा नंदकिशोर ठोंबरे पवन विद्यालय पवनी. सर्व गडकिल्ले स्पर्धकांना प्रोत्साहन बक्षिस देण्यात आले. सहभागी विद्यार्थ्याना फ्लायकैचर वाईल्ड संस्थेकडुन आवळा , आंबा व फणसाचे झाडे देण्यात आली. सुमारे सहा तास हा सोहळा चालला. या सोहळ्याला प्रमुख उपस्थितांमध्ये खा.सुनिलज मेंढे, आ.डाॅ.परीणय फुके,
भाजप जिल्हा अध्यक्ष शिवरामजी गिरेपुंजे, माजी आ.चरणजी वाघमारे, माजी आ. बाळा काशिवार, माजी आ. अँड.रामचंद्र अवसरे, विलास काटेखाये, अनिल मेंढे, मोहन सुरकर, अँड.महेंद्र गोस्वामी, किशोर पंचभाई, शिवशंकर मुगांटे, माधुरी नखाते, अनुराधा बुराडे, चंद्रकला गजभिये व अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फ्लायकैचर वाईल्ड चे पंकज देशमुख, निलीमा लेपसे ,संदिप समर्थ, लोकेश दडवे, भाजपचे राजेंद्र फुलबांधे, हिरालाल वैद्य, प्रकाश कुर्झेकर, शरद देवाडे, अमोल उराडे मच्छिंद्र हटवार,अजय चव्हाण, संदिप नंदरधने, दत्तु मुनरतीवार, प्रमोद मेंढे,सतिस जांभुळकर, देवानंद खोपे,संकुल शहारे, गिरीश उरकुडकर, गजानन जिभकाटे, विवेक चामोसिकर, दिलीप कोसराबे, सुरेश अवसरे,मयुर रेवतकर, मितेश हटवार, दुष्यंत देशमुख, प्रिती जिभकाटे ,मेंढे मैडम रैनबो व मोटघरे मैडम मनोसुमन व अन्य लोकांने सहकार्य केले.