संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया.
नवेगावबांध दि.22 फेब्रुवारी:-
ग्रामपंचायत नवेगावबांधणे तत्परता दाखवून, बेघर झालेल्या येथील प्रभाग क्रमांक सहा मधील वच्छला गोपीचंद कुंभरे यांना तात्पुरता निवारा तात्काळ उपलब्ध करून दिला. दिनांक 20 फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास वच्छलाबाई चे कुटुंब गाढ झोपेत असताना घर कोसळले होते. त्यात यांची सून उर्मिलाबाई जखमी झाली होती. त्याच दिवशी ग्रामपंचायत नवेगावबांधचे ग्रामविकास अधिकारी परशुराम चव्हाण, तलाठी पुंडलिक कुंभरे, सरपंच अनिरुद्ध शहारे, ग्रामपंचायत सदस्य संजय उजवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन, तात्काळ पंचनामा केला होता. पंचनामा पंचायत समिती अर्जुनी मोरगाव येथील वरिष्ठांकडे तात्काळ सादर करून, ग्रामपंचायत चे पंधरा टक्के निधीतून तात्काळ निधी मंजूर करून त्यांना तात्काळ निवाऱ्याची व्यवस्था करून दिली. या दुर्घटनेत वच्छलाबाई कुंभरे व त्यांचे पाच कुटुंबीय थोडक्यात बचावले होते. ग्रामपंचायतच्या या तत्परतेचे व बेघर झालेल्या वच्छलाबाई ला तात्काळ मदत दिल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.