न्युज 24 मराठी विशेष
राज्यात कोरोना रुग्ण वाढीमुळे ठाकरे सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहिलं असताना दुसरीकडे मात्र बनावट पॉझिटिव्ह रिपोर्ट देणाऱ्यांची टोळी सक्रिय झाल्याचा आरोप अमरावती मधील स्थानिक काँग्रेसच्या नेत्याने केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णवाढीची संख्या वाढल्याने पुन्हा लॉक डाऊन होणार का ? अशी चर्चा सुरू आहे. दिवसाला सहा हजारांपेक्षा अधिक रुग्ण राज्यात आढळून येत आहेत. त्यामुळे प्रशासन देखील अलर्ट वर आलं आहे . अनेक ठिकाणी संचारबंदी अल्प स्वरूपात लॉक डाऊन अशा उपाययोजना केल्या जात आहेत .राज्यातील ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोना ची लागण झाली आहे. अलीकडेच जयंत पाटील, राजेश टोपे , छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्यांना कोरोना झाला आहे . परंतु अधिवेशनाचा आधीच राज्यात कोरोना कसा काय वाढतो असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. यातच अमरावतीच्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर खोटे रिपोर्ट देणारी टोळी सक्रीय असल्याची घटना उघडकीस येत आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. परंतु सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने अशाप्रकारे आरोप लावल्याने विरोधकांना सरकारवर टीका करण्याची संधी सापडली आहे.
अमरावती शहरात कोरोना चाचणीचे पॉझिटिव अहवाल देणारी सक्रिय असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी आमसभेत केला आहे. त्यांच्या या आरोपावर जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी चौकशी करून या संदर्भात विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश सीईओ यांना झेडपी अध्यक्षांनी दिले संक्रमित यांच्या वाढत्या संख्येमुळे अमरावती जिल्हा प्रशासन हादरले असून 20 फेब्रुवारीपासून अमरावती अचलपूर शहरात आठवडाभराचा संपूर्ण लॉकडाऊन ची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान वाढत्या रुग्ण संख्येमुळे सध्या अमरावती चे नाव देशभर चर्चेत आले आहे .याला हे रॅकेटच कारणीभूत असल्याचा दावा प्रकाश साबळे यांनी केला आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद आमसभेत प्रकाश साबळे यांनी स्वतःचे उदाहरण पुढे करीत , मलाच एका डॉक्टरने तुम्हाला पॉझिटिव्ह अहवाल हवा आहे का ? अशी ऑफर दिली होती , असे धक्कादायक विधान केले. यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सीईओ अमोल येडगे यांना चौकशीचे आदेश दिले . तत्पूर्वी स्वतः बबलू देशमुख यांनीही साबळे यांच्या दाव्याचे अनुमोदन करीत आणखी एका पदाधिकाऱ्याने देखील ही बाब लक्षात आणून दिल्याचे सांगत साबळे च्या विधानाला सभागृहात दुजोरा दिला . मात्र सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनीच अशाप्रकारे विधान केल्यामुळे भाजपा ही चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं .याबाबत भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी म्हणाले की , अमरावतीत ज्या रुग्णांना कोरोना झाला नाही त्यांनाही कोरोना पॉझिटिव दाखवल्याचा आरोप युवा काँग्रेसच्या नेत्यांनी जिल्हा परिषद आमसभेत केले आहे जिल्हा परिषद अध्यक्षांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत . एकीकडे महाविकास आघाडी सरकारमधील पालक मंत्री यशोमती ठाकूर अमरावतीत कोरोणा वाढल्याने लॉकडाऊन थोपवलं आहे आणि दुसरीकडे बनावट कोरोना रुग्णांची रॅकेट असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे, त्यामुळे मी जबाबदार म्हणणार यांनी यात लक्ष घालून या प्रकरणाची चौकशी करावी. लोकांच्या मनात जो संभ्रम झाला आहे तो दूर करणं आवश्यक आहे , अशी मागणी केली आहे. विभागात कोरोना नियंत्रणासाठी आता अमरावती ,अकोला महापालिका आणि अचलपूर अकोट व मुर्तीजापुर नगरपरिषद हद्दीत सोमवारी रात्री आठ वाजता पासून पुन्हा सात दिवस लॉकडाऊनचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे . या काळात जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व व्यवहार बंद असतील. अमरावतीत पालकमंत्री यशोमती ठाकूर व अकोल्यात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी ही घोषणा केली. राज्यात शनिवारी 6,971 रुग्ण आणि 35 बाधित यांचा मृत्यू झाला होता. त्या तुलनेत सोमवारी नवीन बाधित तसेच मृत्यूचे प्रमाण काहीसे कमी झाले. सोमवारी दिवसभरात 5,035 रुग्ण बरे होऊन घरी गेले . तर आतापर्यंत एकूण 19, 99 ,982 रुग्ण कोरोना मुक्त झाले. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.4 टक्के झाले आहे.