महाराष्ट्र

धनगर आरक्षणाचा जीआर तात्काळ काढा अन्यथा रस्त्यावर उतरू-शिवाजी मोरे-पाटील

सोलापूर प्रतिनिधी / चंदु खिलारे धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या ६० वर्षापासून आंदोलन मोर्चे करत आहोत.या समाजाला अद्याप कोणत्याही सरकारने न्याय दिला नाही,फक्त निवडणुकीपुरता वापर करून घेतला आहे.२०१४ च्या निवडणुकीपूर्वी भाजप सरकारने धनगर समाजाला आम्हाला निवडून द्या,पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ असे आश्वासन दिले होते.दहा वर्ष उलटले तरी भाजप सरकारने अद्याप मागणी मान्य केली नसून,भाजपने समाजाला फसवले आहे. समाज बांधवांच्या वतीने पंढरपूर येथे गेल्या 10 दिवसापासून सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांची तब्बेत खालावली असून,धनगर समाजाचे नेते शिवाजी मोरे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना भेटून जाहीर पाठिंबा दिला आहे.या मागणीची सरकारने गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ आरक्षणाचा अध्यादेश काढावा अन्यथा आम्हालाही रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल,असा इशारा धनगर समाजाचे नेते शिवाजी मोरे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button